VIDEO : हनुमान चालिसा हा विषय महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायला कारणीभूत ठरतो?: Arvind Sawant
हनुमान चालिसा हा विषय महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायला कारणीभूत ठरतो आहे का?, असा प्रश्न आता अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. कारण हनुमान चालिसामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला झाला होता. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय.
हनुमान चालिसा हा विषय महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायला कारणीभूत ठरतो आहे का?, असा प्रश्न आता अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. कारण हनुमान चालिसामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला झाला होता. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय. कारण किरीट सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम असण्याची शंका आता घेतली जाते आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांना हनुवाटीतून रक्त येत असल्याचं दिसून आलं होतं.
