राज्यात सध्या हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अयोध्या आणि बाबरी मशिदीवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडली त्यावेळी अयोध्येत होतो असा दावा केला होता. तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता असा दावाही फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या याच दाव्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. ‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावलाय.