भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातले एन. डी. पाटील हे मोठे नाव होते. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. आम्ही विरुद्ध विचारांचे आम्ही असलो तरी खर ते खरं, खोटं ते खोटं असं त्यांचा म्हणणं होतं. टोलची खोकी जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार असे ते म्हणाले होते. टोलच्या प्रश्नात आम्ही एकत्र आलो होतो. पक्ष, विचार जरी वेगळे असले तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ते संघर्ष करत राहिले. पानसरे यांच्या जाण्याने त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांना न्याय मिळावा यासाठी ते झटत राहिले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.