नाना पटोले यांनी राज्यातील सरकारवर जहरी टिका केलीयं. नाना पटोले म्हणाले की, राज्यात राज्यात दोन अपंग लोकांचे सरकार स्थापन झाले आहे. आता नानांच्या या टिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर हा निशाना साधलायं. इतकेच नाही तर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मंत्रीमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे आमदार अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार हे समजू शकले नाहीयं.