कोल्हापूरनंतर सोलापुरातही मराठा आरक्षणासाठी 4 जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकरल्याने मोर्चा काढला गेला नाही. दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकरली असली तरी लवकरच आम्ही मोर्चा काढू अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी ही ब्रिटीश सरकारपेक्षाही वाईट असून अशाप्रकारे कितीही दडपण्याता प्रयत्न केला तरी मराठा आंदोलन निघणारच अशी भूमिका स्पष्ट केली आहे.