कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक

कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक

| Updated on: Mar 01, 2026 | 12:37 PM

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे कांद्याच्या बाजारभावातील घसरणीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याला प्रति क्विंटल ₹2500 उत्पादन खर्च येत असताना, केवळ ₹7-8 प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. शासनाने प्रति क्विंटल ₹1500 अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील लासलगाव उपबाजार आवारात कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा मोठ्या तोट्यात विकावा लागत असल्याने, नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदे ओतले.

शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उन्हाळ कांद्याचे उत्पादन खर्चही वसूल झाला नसल्याचे सांगितले. यावर्षीचा लाल कांदा केवळ ₹7-8 प्रति किलो दराने विकला जात आहे, तर त्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल ₹2500 येतो. यामुळे शासनाने तातडीने प्रति क्विंटल ₹1500 अनुदान देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास, लोकप्रतिनिधींना नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Published on: Mar 01, 2026 12:37 PM
Follow Us