Nawab Malik on Aryan | एनसीबीकडून खोटी कारवाई, आर्यनच्या सुटकेनंतर मलिकांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 30, 2021 | 2:51 PM

शासकीय कर्मचाऱ्याशिवाय प्रायव्हेट आर्मी समीर वानखेडे यांनी तयार केली होती. त्या प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून समीर वानखेडे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Follow us on

आर्यन खानला अगोदरचं जामीन मिळायला हवा होता, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. बोगस केसमध्ये अडकवण्यात आलं. पब्लिसिटीसाठी यांना अडकवण्यात आलं आहे. शासकीय कर्मचाऱ्याशिवाय प्रायव्हेट आर्मी समीर वानखेडे यांनी तयार केली होती. त्या प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून समीर वानखेडे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान आणि इतरांना यापूर्वीच जामीन मिळायला हवा होता, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.