परळी: ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा (Tiranga) फडकवण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत. उद्या 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. परळीत तिरंगा रॅलीचे (Tiranga Rally) आयोजन करण्यात आले होते. भाजपनेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. यावेळी पंकजा मुंडेंनी ढोल वाजवला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.