रत्नागिरी: जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात अनेकदा होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.