पुणे : लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिलेले असताना राज्यात राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढची भूमिका काय असणार, महाविकास आघाडीसोबत जाणार की युती करणार? याविषयी राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी आणि भाजप – शिवसेनासेना युतीसोबत जाणार नाही. लोकसभेच्या 6 जागा या स्वबळावर लढणार आणि इतर 42 जागा समविचारी लोकांसोबत जाणार आहोत, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.चंद्रशेखर राव यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यांच्या सभेला यापुढे जर प्रतिसाद वाढला तर नवल वाटायला नको, असंही ते म्हणाले आहेत.