महाड: महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे. कालपर्यंत डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनून राहिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांचे संसार मातीला मिळाले आहेत. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरू असून मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. Raigad Mahad Taliye Village landslides many people Disappeared