महाराष्ट्रात 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता ; राजेश टोपेंची घोषणा

महाराष्ट्रात 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता ; राजेश टोपेंची घोषणा

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 29, 2021 | 6:20 PM

राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना टास्क फोर्सच्या मिटींगमधील चर्चेची माहिती दिली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे.

राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना टास्क फोर्सच्या मिटींगमधील चर्चेची माहिती दिली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us