Maharashtra Band | Pune | केंद्र सरकार ब्रिटीश राजवटीपेक्षाही भयानक : रुपाली चाकणकर

| Updated on: Oct 11, 2021 | 12:11 PM

शेतकरी आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मोडून काढण्याचं काम देशातील केंद्र सरकार करत आहे. ब्रिटीश राजवटीपेक्षाही हे केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Follow us on

केंद्र सरकारने जो कृषी कायदा केलाय, त्याला देशातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र सरकार कोणत्याही समझोत्याला तयार नाहीय. गेल्या 300 दिवसांपासून शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. यामध्ये अनेक शेतकरी शहीद झालेत. पण या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मोडून काढण्याचं काम देशातील केंद्र सरकार करत आहे. ब्रिटीश राजवटीपेक्षाही हे केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.