सांगली : सांगलीमधील मासे मृत्यू प्रकरणी प्रदूषण महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा उगारला आहे. अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला प्रदूषण मंडळाने नोटीस बजावलीये. दत्त इंडिया संचलित साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीत मिसळल्याने माशांच्या मृत्यू झाला. साखर कारखाना बंद का करू नये, याबाबत बजावण्यात नोटीस आली आहे. सांगली महापालिकेलाही फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. प्रदूषण महामंडळ अधिकारी नवनाथ औताडे यांनी ही माहिती दिली आहे. तसंच सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यूनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.