मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना यंदा तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केलं जाईल, असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. सावरकरांच्या अपमानाचं राजकारण करणाऱ्या भाजपला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखलं आहे? बाळासाहेब आणि सावरकर यांच्याबाबतची भूमिका भाजपने स्पष्ट करावी, असं संजय राऊत म्हणालेत.