Satara Flood :  मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे जरा लक्ष द्या, नाहीतर आम्ही… सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याचा आक्रोश

Satara Flood : मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे जरा लक्ष द्या, नाहीतर आम्ही… सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याचा आक्रोश

Harshada Shinkar | Updated on: Sep 28, 2025 | 5:43 PM

सातारा जिल्ह्यातील शामगाव येथील शेतकरी बापुराव पोळ यांचे सोयाबीन पीक अतिवृष्टी आणि पाणी साचल्याने पूर्णपणे नष्ट झाले आहे. उन्हाळ्यात पाणी नाही आणि पावसाळ्यात ओला दुष्काळ अशी त्यांची व्यथा आहे.

सातारा जिल्ह्यातील शामगाव येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बापुराव पोळ या शामगावातील शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचल्याने त्यांचे संपूर्ण सोयाबीन पीक वाहून गेले आहे. नुकसानीमुळे व्यथित झालेल्या बापुराव पोळ यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

ते आपल्या व्यथा मांडताना म्हणाले, “उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही, तर पावसाळ्यात शेतातून पाणी काही संपत नाही. हा तर ओला दुष्काळ आहे. आम्ही काय करावे मुख्यमंत्री साहेब? आमच्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ.” बापुराव पोळ यांनी मुख्यमंत्री महोदयांना थेट प्रश्न विचारला आहे की, “आम्ही जगावे की मरावे?” सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्याने ते हताश झाले आहेत. या गंभीर परिस्थितीत सरकारने त्वरित मदत करावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

Published on: Sep 28, 2025 5:43 PM
Follow Us