शिरूर/पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं करतात काय असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला असून कायद्याचा धाक राहिला नसल्याचे प्रतीक असल्याचा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत सखोल तपास व्हायला हवा आणि जे दोशी आहेत, त्यांच्यावर कड्क कारवाई करण्याची मागणी यावेळी कोल्हे यांनी केले आहे.