सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासांचे भारनियमन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावात सकाळी सहा ते नऊ या वेळेत भारनियमन असणार आहे. कोळशाच्या टंचाईमुळे विविध औष्णिक केंद्रातील औष्णिक केंद्रातील 13 संच सद्यस्थितीत बंद आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सकाळच्या सत्रात विजेचा सर्वाधिक वापर होत असल्याने भारनियमन सुरु करण्यात आले आहेत.