मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विकेंड लॉकडाऊन आजचा पहिलाच दिवस होता. सरकारच्या या निर्णयाला काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद लाभला. जाणून घेऊयात राज्यात विकेंड लॉकडाऊन नेमका कसा राहिला.