SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 13 November 2021

| Updated on: Nov 13, 2021 | 8:38 AM

एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा सवाल अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावेळी परब यांनी सूचक उत्तर दिलंय. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि पवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सरकार सर्वच पातळ्यांवर विचार करत आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं अनिल परब म्हणाले.

Follow us on

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी राज्यात सर्वत्र एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरही गेल्या चार दिवसांपासून बेमुदत संप सुरु आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत आझाद मैदानात ठिय्या मांडून आहेत. अशावेळी राज्य सरकारनेही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कालपर्यंत 2 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलीय. तसंच ही कारवाई यापुढे अधिक कडक केली जाईल, असा सूचक इशाराही परब यांनी दिलाय.

दरम्यान, एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा सवाल अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावेळी परब यांनी सूचक उत्तर दिलंय. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि पवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सरकार सर्वच पातळ्यांवर विचार करत आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं अनिल परब म्हणाले. कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.