4 Minutes 24 Headlines | राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कृतीवरच आक्षेप घेतला. तसेच त्यांनी, तर, राज्यपालांच्या बहुमत चाचणी घेण्याच्या कृतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. तर राज्यपालांनी तीन वर्षाचा संसार एका रात्रीत कसा मोडला हे ही विचारायला हवं होतं असेही म्हटलं आहे. यावेळी 38 आमदारांच्या जीवाला धोका असल्यानेच त्यांना राज्यपालांकडून सुरक्षा पुरवण्याच्या आदेश देण्यात आल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संजय रावतांच्या धमकीचा उल्लेख देखील केला.