VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 05 August 2022

| Updated on: Aug 05, 2022 | 12:21 PM

मनुष्यहानी झाली आहे, पाळीव प्राण्याची हानी झाली आहे, घरांची पडझड झाली आहे, छोटे-मोठे त्याचबरोबर गावातील रस्ते सगळ्याचीच दुरवस्था झाली आहे. जे काही पूल असतात, त्यांचीही पडझड झाली असून संपर्काचे माध्यमच बंद झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.

Follow us on

सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही जण तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलायला लागले आहेत. हे राज्यासाठी भूषणावह नाही. त्यामुळे त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. मनुष्यहानी झाली आहे, पाळीव प्राण्याची हानी झाली आहे, घरांची पडझड झाली आहे, छोटे-मोठे त्याचबरोबर गावातील रस्ते सगळ्याचीच दुरवस्था झाली आहे. जे काही पूल असतात, त्यांचीही पडझड झाली असून संपर्काचे माध्यमच बंद झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.