सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर… उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
Uddhav Thackeray | 20 तारखेला CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठ्या मोर्चाचं आयोजित केलं आहे. याबाबात बोलताना ठाकरेंनी दावा की, काही गुंड तिकडे सोडून आंदोलन चिरडलं जाणार आहे, असा दीपकेंचा दावा आहे. हे हिणकस आणि नीच प्रवृत्तीचं आहे. मात्र वांगचुक आणि दीपके कुणासाठी लढत आहे. आपल्यासाठीच लढत आहेत.
Uddhav Thackeray | 20 तारखेला CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठ्या मोर्चाचं आयोजित केलं आहे. याबाबात बोलताना ठाकरेंनी दावा की, काही गुंड तिकडे सोडून आंदोलन चिरडलं जाणार आहे, असा दीपकेंचा दावा आहे. हे हिणकस आणि नीच प्रवृत्तीचं आहे. मात्र वांगचुक आणि दीपके कुणासाठी लढत आहे. आपल्यासाठीच लढत आहेत.
एका टिप्पणीमधून कॉकरोच जनता पार्टी जन्माला आली. आता या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्याबद्दल आज उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ठाकरे म्हणाले, “मी एका विषयासाठी आलो आहे. लोक बोलत नाहीत. जंतरमंतरवर दीपकेने जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीटचे परीक्षा पेपर फुटले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी लक्ष दिले. सरकारला वेळ नाही. खासदार फोडाफोडीकडे त्यांचं लक्ष आहे”. या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांनाही मोठं आवाहान केलं आहे.
ठाकरेंनी सांगितलं, राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी आदोलनं करावी आणि मोर्चे काढायला हवेत. सरकारला अनेक विषयांवर प्रश्न विचारायला हवेत. असं त्यांनी सांगितलं.
