अखेर तेच घडलं! …म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट…
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही महारष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. याठिकाणी ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं?
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही महारष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. याठिकाणी ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याच्या चर्चा होत्या. या मोहिमेअंतर्गत ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या सर्वच खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र अनेक जण अनुपस्थित होते, असं सांगितलं जातं.
दरम्यान आता ठाकरेंच्या याच खासदारांबाबत मोठी आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, असे सांगितले जात आहे. लवकरच हे नेते लोकसभा अध्यक्षाकडे पत्र देणार आहेत अशी चर्चा आहे. याच कारणास्तव संजय राऊत दिल्लीला रवाना झाल्याचंही कळत आहे.
