Mumbai | मुंबईत मंत्रालयात आढळल्या दारुच्या बाटल्या, बाटल्या कशा आल्या असा प्रश्न

Mumbai | मुंबईत मंत्रालयात आढळल्या दारुच्या बाटल्या, बाटल्या कशा आल्या असा प्रश्न

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 3:40 PM

मंत्रालयात पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

राज्याचा कारभार जिथून चालतो, त्या मंत्रालयातच दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा असा प्रश्न आहे.