नंदूरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आज जिल्ह्यातील एकून 149 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी मतदानासाठी नागरिक कमी संख्येनं येत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र दुपारी मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. शिंदे, फडणवीस सरकारच्या नव्या निर्णयानुसार यंदा सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.