WTC Final 2021 | विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न

| Updated on: Jun 24, 2021 | 10:19 AM

या सामन्यात भारताच्या पराभवाची काही ठराविक कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (five reason of team India lost WTC Final 2021 ).

Follow us on

साउथम्पटन : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. वास्तविक पाहता गेल्या पाच दिवसांपासूनचा खेळ पाहता टीम इंडियाला आजच्या दिवशी विश्व विजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, या सामन्याच्या राखीव दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भारताचे शिलेदार फार काळ तग धरु शकले नाहीत. त्यामुळे भारतीयसंघ अवघ्या 170 धावांमध्ये तंबूत परतला. त्यानंतर 139 धावांच्या माफक आव्हानाला न्यूझीलंडने 8 गडी राखत पूर्ण केलं. दरम्यान, या सामन्यात भारताच्या पराभवाची काही ठराविक कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (five reason of team India lost WTC Final 2021 ).