उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज पुरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणी केलीय. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील होते. जिल्ह्यातील पुर परिस्थितीला मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस कारणीभूत आहे. आम्हा महिनाभराच्या आत नुकसानीचे पंचनामे करुन मदत जाहीर करु अशी माहिती शंकरराव गडाख यांनी दिली. तर गेल्या वर्षीच्या नुकसानाची मदत केंद्रसरकारने दिली नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.