AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paddy Crop : काय सांगता..? धान खरेदीचेही होणार चित्रीकरण,पणन संघाचा निर्णय कुणाच्या पत्त्यावर..!

भंडारा जिल्ह्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाढीव उत्पादनामुळे कमी भाव मिळू नये म्हणून विदर्भात पणन महासंघाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरु केले जातात. एवढेच नाहीतर प्रत्येक खरेदी केंद्राला उद्दिष्ट हे ठरवून दिले जाते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील खरेदी केंद्रासाठी 6 लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठरवून दिले होते.

Paddy Crop : काय सांगता..? धान खरेदीचेही होणार चित्रीकरण,पणन संघाचा निर्णय कुणाच्या पत्त्यावर..!
खरेदी केंद्रावर साठा केलेले धान पीकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 2:31 PM
Share

भंडारा : (Bhandara District) भंडारा जिल्ह्यातील (Paddy Crop) धान खरेदीचा घोटाळा हा राज्यात चर्चेचा विषय बनला होता. कारण जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र चालकांनी पराक्रमच तसा केला होता. अवघ्या 6 तासांमध्ये 6 लाख क्विंटल धानाची खरेदी दाखवण्यात आली होती. त्यामुळे (Panan Federation) पणनं महासंघानेही आश्चर्य व्यक्त केले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या या खरेदी केंद्राचा नेमका फायदा कुणाला हे जाणून घेण्यासाठी आणि कारभारात तत्परता येण्यासाठी आता धानाच्या खरेदीचे चित्रीकरण केले जाणार आहे. याबाबत पणन महासंघाच्या सरव्यवस्थापकानेच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे बदललेल्या नियमावलीचा फायदा हा धान उत्पादक शेतकऱ्यांना होईल आणि व्यापाऱ्यांचा वाढत हस्तक्षेप त्याला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

धान खरेदीत नेमके काय झाले?

भंडारा जिल्ह्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाढीव उत्पादनामुळे कमी भाव मिळू नये म्हणून विदर्भात पणन महासंघाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरु केले जातात. एवढेच नाहीतर प्रत्येक खरेदी केंद्राला उद्दिष्ट हे ठरवून दिले जाते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील खरेदी केंद्रासाठी 6 लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र, जिल्ह्यातील खरेदी केंद्रांनी हे उद्दिष्ट केवळ 6 तासांमध्येच पूर्ण केले. त्यामुळे धान खरेदीवर पीक नेमके शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे नियमावलीत बदल करण्यात आला आहे.

धान खरेदीमध्ये घोटाळा

एकाच दिवसांमध्ये 6 लाख क्विंटल धानाची खरेदी कशी ? असा सवाल उपस्थित झाला होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाची चौकशीही झाली. यामध्ये खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा नव्हे तर व्यापाऱ्यांचाच माल आल्याचे समोर आले होते. संबंधित उद्दिष्ट हे 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे होते पण 7 जुलै याच दिवशी संपूर्ण खरेदी झाल्याचे दाखवण्यात आले होते. याबाबत अद्यापपर्यंत कुणावर कारावाई झाली नसली तरी पणन महासंघाने नियामावलीतच बदल केला आहे. आता धानाची खरेदी ही चित्रीकरणातच होणार आहे.

रब्बी हंगामापासून बदलणार चित्र

रब्बी हंगामात धानाची किती खरेदी करायची याचे उद्दिष्ट जिल्ह्याला ठरवून देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातून पणन महासंघ हा 5 लाख 92 हजार 380 क्विंटलची धान खरेदी करणार आहे. शिवाय ही खरेदी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. किमान यंदा तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी पणन महासंघाने घेतली आहे. पणन महासंघाचे सरव्यवस्थापक जिल्हा पणन अधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले असून त्यात धान खरेदीचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते जतन करून ठेवण्याबाबत सर्व धान खरेदी केंद्रांना आदेश दिले आहे. उद्दिष्टाच्या मर्यादेत आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे खरेदी करावी असेही यात म्हटले आहे त्यामुळे अनियमिततेला आळा बसेल असा विश्वास पणन महासंघाला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.