AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत यावरुन अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने झाली आहेत. ऐन रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच ही कारवाई केली जात असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव सर्कल मधील 6 गावच्या शेतकऱ्यांनी महावितरणने ठरवून दिलेली रक्कम अदा केली आहे. असे असतानाही संपूर्ण थकबाकीच अदा करण्याची मागणी होत आहे.

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत,  नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!
कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 10:17 AM
Share

नांदेड : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत यावरुन अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने झाली आहेत. ऐन (Rabi Season) रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच ही कारवाई केली जात असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. पण (Nanded District) नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव सर्कल मधील 6 गावच्या शेतकऱ्यांनी महावितरणने ठरवून दिलेली (Agricultural Pump) कृषीपंपाची थकबाकी अदा केली आहे. असे असतानाही संपूर्ण थकबाकीच अदा करण्याची मागणी होत आहे. या सक्तीच्या वसुली विरोधात आता शिवसेनाच आक्रमक झाली आहे. महावितरणच्या या कारभाराचा निषेध करीत महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. नियमित वेळी विद्युत पुरवठा करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिवाय वेळेत विद्युत पुरवठा न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित वेळी विद्युत पुरवठा केला जात नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. भविष्यात उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महावितरणकडून नियमबाह्य वसुली

एकूण थकबाकी नाही तर विजबिलाच्या 25 टक्के रक्कम अदा झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यामुळे रखडलेली वसुलीही होईल आणि रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होणार नाही असा दुहेरी उद्देश साधला जात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव सर्कलमध्ये संपूर्ण थकबाकी अदा केल्यावरच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल अशी भूमिका महावितरणने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

मराठवाड्यात सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. यातच रब्बी हंगामातील पिके जोमात असून पीक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. असे असतानाच विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने पिकांची जोपासणा करावी कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय ठरवून दिलेली रक्कम अदा करुनही सुरळीत पुरवठा होत नसल्याने महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनात

निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच आता कुठे वातावरण निवळले आहे यातच महावितरणकडून मनमानी कारभार केला जात आहे. शेतकऱ्यांकडून थकीत रक्कमही अदा केली जाईल पण त्यासाठी रब्बी हंगामातील पिके पदरी पडणे गरजेचे आहे. या उत्पन्नातूनच हे पैसे अदा केली जातील. महावितरणने कठोर भूमिका घेतली तर यापुढेही आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Mango : उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्याच्या तोंडावर चाखा आता केसरची चव, कशामुळे ओढावली परस्थिती?

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?

PM Kisan : 48 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही 10 हप्ता, योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग ‘ही’ प्रक्रिया कराच..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.