AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे ‘असे’ करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला

हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. मात्र वाढत्या उत्पादनाबरोबरच या पिकाला किडीचा धोका आहे हरभऱ्याच्या यशस्वी उत्पादनाती मधील सर्वात मोठी अडचण म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. देशी वाणांपेक्षा काबुली वाण याला अधिक प्रमाणात बळी पडतात त्यामुळे कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे 'असे' करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 1:09 PM
Share

लातूर : रब्बी हंगामात हरभरा क्षेत्र वाढत आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाला असून हरभऱ्याचे क्षेत्र वाढलेले आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे ज्वारीची पेरणी करता आली नाही. शेतकऱ्यांनी हरभरा याच पिकावर भर दिला आहे. शिवाय कृषी विभागानेही हरभऱ्याचे उत्पादन घेण्याचे अवाहन शेतकऱ्यांना केले होते. हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. मात्र वाढत्या उत्पादनाबरोबरच या पिकाला किडीचा धोका आहे हरभऱ्याच्या यशस्वी उत्पादनाती मधील सर्वात मोठी अडचण म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. देशी वाणांपेक्षा काबुली वाण याला अधिक प्रमाणात बळी पडतात त्यामुळे कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

आळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकासाठी धोकादायक

1) पाने पोखरणारी आळी ही 3 मी लांब असते ही आळी पानांमध्ये शिरून नागमोडी वळणाची पोखरण करते आणि पानाचा हिरवा भाग खाऊन उपजिवीका करते. अळीचा अधिकचा प्रादुर्भाव झाल्यास पानगळीला सुरवात होते. त्यामुळे पिकाची वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावरही याचा परिणाम होतो.

2) लष्करी आळी हिरव्या रंगाच्या असून 25 मिमी लांब असते यामुळे हरभऱ्याचे झाडेही पान विरहीत होतात कधीकधी हरभऱ्याच्या घाटावर देखील ही अळी आक्रमण करते. थेट उत्पादनावरच परिणाम होत असून याचे प्रमाण वाढले तर ऐन बहरातच पिकांचे नुकसान होते. विशेष: हरभरा पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

3) रोप कुरतडणाऱ्या आळी केळी काळपट रंगाचे असून 40 मी लांब असते तर रात्रीच्या वेळेस हरभऱ्याचे रोपटे ही आळी जमिनीलगतच कापते आणि कावळ्या पानावर आपली उपजीविका करते. पाने खाण्यापेक्षा पाणी कापल्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते.

4) घाटे आळी शेळी अमेरिकन बोंड आळी हिरवी बोंडअळी हरभऱ्यातील घाटे आळी व शेंगा पोखरणाऱ्या आळी या नावाने ओळखले जाते. आळीचा प्रादुर्भाव कडधान्यांमध्ये तूर, हरभरा, वाटाणा, उडीद, मूग, मसूर तसेच चवळी व याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात घट होते.

आळी मुळे होणारे नुकसान

लहान आळ्या सुरुवातीला कवळी पाने, कळ्या, फुले, कुरतडून खातात घाटे भरल्यानंतर आणि घाट्यात डोके खुपसून दाणे फस्त करतात. साधारण एक आळी ही 30 ते 40 झाड्यांचे नुकसान करते त्यामुळे उत्पादनात घट होते

असे करा व्यवस्थापन

घाटेअळीचा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रतिहेक्‍टर एच. एन. टी 250 रोगग्रस्त यांचा अर्थ फवारा वा याकरिता अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणी पण टाकून हे द्रावण एक मिलि प्रति लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी हे फवारणी पिक शेतात प्रथम आणि द्वीतीय अवस्थेत असताना केल्यास अतिशय प्रभावी होते. त्यामुळे वेळेत आळीचा बंदोबस्त होतो तर पिकाच्या वाढीतील अडथळाही दूर होतो.

रासायनिक कीटकनाशके

आळीचा प्रादुर्भावा आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास एन्डोसल्फान 20 मिली क्विनॉलफॉस 20 मिली मोनोक्रोटोफास अकरा मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. यंदा पिकासाठी पोषक वातावरण असले तरी वाढत्या किडीचा धोकाही त्याच प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापासून पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दरवाढीत बियाणे कंपनीचाही वाटा, अकोल्यात सर्वाधिक दर

तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांना जायकवाडी धरणातील पाणी, प्रथमच शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय

Follow Us
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.