AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad : नाव मोठं अन् लक्षण खोटं, हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

कन्नड तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या तिन्हीही दुकानातून वाढीव दराने खते आणि बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात होती. कृषी सेवा केंद्रांची नावे तर गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र पण याच दुकानातून शेतकऱ्यांकडून अधिकचा मेवा घेतला जात होता.

Aurangabad : नाव मोठं अन् लक्षण खोटं, हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
बनावट खत
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 06, 2022 | 4:31 PM
Share

औरंगाबाद : यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच (Market) बाजारपेठेत खत-बियाणांची (Artificial scarcity) कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याचा संशय कृषी विभागाला होता. त्यानुसार ज्यादा दराने निविष्ठांची विक्री करण्यासही सुरवात झाली होती. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ज्यादा दराने खत आणि बियाणांची विक्री करणाऱ्या ती कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. (Agricultural Department) कृषी विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली असून हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांची लूट सुरु झाली आहे. कृषी सेवा केंद्राच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच भरारी पथकांकडून आता कारवाईला देखील सुरवात झाली आहे. मध्यंतरी वर्धा येथे कारवाई झाल्यानंतर आता कन्नड तालुक्यातील 3 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत.

नावात देव काम सैतानाचे

कन्नड तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या तिन्हीही दुकानातून वाढीव दराने खते आणि बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात होती. कृषी सेवा केंद्रांची नावे तर गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र पण याच दुकानातून शेतकऱ्यांकडून अधिकचा मेवा घेतला जात होता. मात्र, भरारी पथकांनी वेळीच कारवाई केल्याने आता ऐन हंगामात अशा घटनांवर निर्बंध येईल. या तिन्हही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्यांना खत-बियाणांची विक्री करता येणार की नाही? हा प्रश्नही बाकी आहे.

कृत्रिम टंचाई अन् महागाईचा बाऊ

यंदा जागतिक स्तरावरील परिणाम खत पुरवठ्यावर होणार अशी चर्चा हंगामाच्या पूर्वीपासूनच आहे. यातच खतासाठी आवश्यक असलेला कच्चा मालाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे यंदा रासायनिक खताची टंचाई भासणार असे चित्र निर्माण झाले होते पण केंद्राने खतासाठी वाढीव अनुदान देऊन वाढत्या दराची झळ ही शेतकऱ्यांना बसलेली नाही. मात्र, याच परस्थितीचा फायदा घेत कृषी सेवा केंद्राकडून अधिकचे दर लावले जात आहेत.हा गैरप्रकार समोर येताच कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात.

Follow Us
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?