AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad : नाव मोठं अन् लक्षण खोटं, हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

कन्नड तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या तिन्हीही दुकानातून वाढीव दराने खते आणि बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात होती. कृषी सेवा केंद्रांची नावे तर गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र पण याच दुकानातून शेतकऱ्यांकडून अधिकचा मेवा घेतला जात होता.

Aurangabad : नाव मोठं अन् लक्षण खोटं, हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
बनावट खत
| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 4:31 PM
Share

औरंगाबाद : यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच (Market) बाजारपेठेत खत-बियाणांची (Artificial scarcity) कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याचा संशय कृषी विभागाला होता. त्यानुसार ज्यादा दराने निविष्ठांची विक्री करण्यासही सुरवात झाली होती. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ज्यादा दराने खत आणि बियाणांची विक्री करणाऱ्या ती कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. (Agricultural Department) कृषी विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली असून हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांची लूट सुरु झाली आहे. कृषी सेवा केंद्राच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच भरारी पथकांकडून आता कारवाईला देखील सुरवात झाली आहे. मध्यंतरी वर्धा येथे कारवाई झाल्यानंतर आता कन्नड तालुक्यातील 3 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत.

नावात देव काम सैतानाचे

कन्नड तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या तिन्हीही दुकानातून वाढीव दराने खते आणि बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात होती. कृषी सेवा केंद्रांची नावे तर गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र पण याच दुकानातून शेतकऱ्यांकडून अधिकचा मेवा घेतला जात होता. मात्र, भरारी पथकांनी वेळीच कारवाई केल्याने आता ऐन हंगामात अशा घटनांवर निर्बंध येईल. या तिन्हही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्यांना खत-बियाणांची विक्री करता येणार की नाही? हा प्रश्नही बाकी आहे.

कृत्रिम टंचाई अन् महागाईचा बाऊ

यंदा जागतिक स्तरावरील परिणाम खत पुरवठ्यावर होणार अशी चर्चा हंगामाच्या पूर्वीपासूनच आहे. यातच खतासाठी आवश्यक असलेला कच्चा मालाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे यंदा रासायनिक खताची टंचाई भासणार असे चित्र निर्माण झाले होते पण केंद्राने खतासाठी वाढीव अनुदान देऊन वाढत्या दराची झळ ही शेतकऱ्यांना बसलेली नाही. मात्र, याच परस्थितीचा फायदा घेत कृषी सेवा केंद्राकडून अधिकचे दर लावले जात आहेत.हा गैरप्रकार समोर येताच कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.