AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ती 5 राज्ये, जिथे शेतकरी सर्वाधिक अन्नधान्य पिकवतात, पंजाब नव्हे, तर हे राज्य पहिल्या क्रमांकावर

भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे आणि फक्त अमेरिका (174 दशलक्ष हेक्टर) भारताच्या पुढे आहे. देशात अनेक राज्ये आहेत, जी अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल आहेत.

| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 6:59 PM
Share
धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचे नाव जगातील अव्वल देशांमध्ये घेतले जाते. चालू आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास 2020-21 मध्ये भारताने 298.3 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे आणि फक्त अमेरिका (174 दशलक्ष हेक्टर) भारताच्या पुढे आहे. देशात अनेक राज्ये आहेत, जी अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल आहेत.

धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचे नाव जगातील अव्वल देशांमध्ये घेतले जाते. चालू आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास 2020-21 मध्ये भारताने 298.3 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे आणि फक्त अमेरिका (174 दशलक्ष हेक्टर) भारताच्या पुढे आहे. देशात अनेक राज्ये आहेत, जी अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल आहेत.

1 / 6
अन्नधान्याच्या उत्पादनाबाबत बोलताना पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. जगातील तांदळाचे एकूण वार्षिक उत्पादन 700 दशलक्ष मेट्रिक टन आहे. यापैकी केवळ बंगालमध्ये सुमारे 15 दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ तयार होतो. तांदळाव्यतिरिक्त आंबा, पेरू, लिची, अननस आणि संत्रा अशी फळे येथे घेतली जातात. दुसरीकडे टोमॅटो, कोबी, भेंडी आणि वांगी भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

अन्नधान्याच्या उत्पादनाबाबत बोलताना पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. जगातील तांदळाचे एकूण वार्षिक उत्पादन 700 दशलक्ष मेट्रिक टन आहे. यापैकी केवळ बंगालमध्ये सुमारे 15 दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ तयार होतो. तांदळाव्यतिरिक्त आंबा, पेरू, लिची, अननस आणि संत्रा अशी फळे येथे घेतली जातात. दुसरीकडे टोमॅटो, कोबी, भेंडी आणि वांगी भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

2 / 6
पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेश येतो. गहू उत्पादनाच्या बाबतीत हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे 35 टक्के उत्पादन हे करते. यूपीच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर भागात सुमारे 96 लाख हेक्टरवर गव्हाची लागवड केली जाते. ऊस लागवडीमध्येही हे राज्य खूप पुढे आहे.

पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेश येतो. गहू उत्पादनाच्या बाबतीत हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे 35 टक्के उत्पादन हे करते. यूपीच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर भागात सुमारे 96 लाख हेक्टरवर गव्हाची लागवड केली जाते. ऊस लागवडीमध्येही हे राज्य खूप पुढे आहे.

3 / 6
देशातील सुपीक राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होते. त्याचबरोबर गहू उत्पादनाच्या बाबतीत पंजाबची गणना अव्वल राज्यांमध्ये केली जाते. एकूण धान्य उत्पादनाच्या बाबतीत पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलिकडच्या वर्षांत येथील उत्पादकता कमी झाली आहे.

देशातील सुपीक राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होते. त्याचबरोबर गहू उत्पादनाच्या बाबतीत पंजाबची गणना अव्वल राज्यांमध्ये केली जाते. एकूण धान्य उत्पादनाच्या बाबतीत पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलिकडच्या वर्षांत येथील उत्पादकता कमी झाली आहे.

4 / 6
भुईमूग, कापूस आणि एरंडीच्या लागवडीच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे खरीप हंगामातील लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला असून उत्पादन कमी आले.

भुईमूग, कापूस आणि एरंडीच्या लागवडीच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे खरीप हंगामातील लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला असून उत्पादन कमी आले.

5 / 6
हरियाणातील सुमारे 70 टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. देशात हरित क्रांती आणण्यात हरियाणाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. येथे गहू, तांदूळ, ऊस, सूर्यफूल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल लागवडीमध्ये देशात हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हे राज्य पशुपालनातही पुढे आहे.

हरियाणातील सुमारे 70 टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. देशात हरित क्रांती आणण्यात हरियाणाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. येथे गहू, तांदूळ, ऊस, सूर्यफूल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल लागवडीमध्ये देशात हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हे राज्य पशुपालनातही पुढे आहे.

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.