AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ती 5 राज्ये, जिथे शेतकरी सर्वाधिक अन्नधान्य पिकवतात, पंजाब नव्हे, तर हे राज्य पहिल्या क्रमांकावर

भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे आणि फक्त अमेरिका (174 दशलक्ष हेक्टर) भारताच्या पुढे आहे. देशात अनेक राज्ये आहेत, जी अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल आहेत.

| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 6:59 PM
Share
धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचे नाव जगातील अव्वल देशांमध्ये घेतले जाते. चालू आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास 2020-21 मध्ये भारताने 298.3 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे आणि फक्त अमेरिका (174 दशलक्ष हेक्टर) भारताच्या पुढे आहे. देशात अनेक राज्ये आहेत, जी अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल आहेत.

धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचे नाव जगातील अव्वल देशांमध्ये घेतले जाते. चालू आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास 2020-21 मध्ये भारताने 298.3 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे आणि फक्त अमेरिका (174 दशलक्ष हेक्टर) भारताच्या पुढे आहे. देशात अनेक राज्ये आहेत, जी अन्नधान्याच्या उत्पादनात अव्वल आहेत.

1 / 6
अन्नधान्याच्या उत्पादनाबाबत बोलताना पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. जगातील तांदळाचे एकूण वार्षिक उत्पादन 700 दशलक्ष मेट्रिक टन आहे. यापैकी केवळ बंगालमध्ये सुमारे 15 दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ तयार होतो. तांदळाव्यतिरिक्त आंबा, पेरू, लिची, अननस आणि संत्रा अशी फळे येथे घेतली जातात. दुसरीकडे टोमॅटो, कोबी, भेंडी आणि वांगी भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

अन्नधान्याच्या उत्पादनाबाबत बोलताना पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. जगातील तांदळाचे एकूण वार्षिक उत्पादन 700 दशलक्ष मेट्रिक टन आहे. यापैकी केवळ बंगालमध्ये सुमारे 15 दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ तयार होतो. तांदळाव्यतिरिक्त आंबा, पेरू, लिची, अननस आणि संत्रा अशी फळे येथे घेतली जातात. दुसरीकडे टोमॅटो, कोबी, भेंडी आणि वांगी भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

2 / 6
पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेश येतो. गहू उत्पादनाच्या बाबतीत हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे 35 टक्के उत्पादन हे करते. यूपीच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर भागात सुमारे 96 लाख हेक्टरवर गव्हाची लागवड केली जाते. ऊस लागवडीमध्येही हे राज्य खूप पुढे आहे.

पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेश येतो. गहू उत्पादनाच्या बाबतीत हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे 35 टक्के उत्पादन हे करते. यूपीच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर भागात सुमारे 96 लाख हेक्टरवर गव्हाची लागवड केली जाते. ऊस लागवडीमध्येही हे राज्य खूप पुढे आहे.

3 / 6
देशातील सुपीक राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होते. त्याचबरोबर गहू उत्पादनाच्या बाबतीत पंजाबची गणना अव्वल राज्यांमध्ये केली जाते. एकूण धान्य उत्पादनाच्या बाबतीत पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलिकडच्या वर्षांत येथील उत्पादकता कमी झाली आहे.

देशातील सुपीक राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होते. त्याचबरोबर गहू उत्पादनाच्या बाबतीत पंजाबची गणना अव्वल राज्यांमध्ये केली जाते. एकूण धान्य उत्पादनाच्या बाबतीत पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलिकडच्या वर्षांत येथील उत्पादकता कमी झाली आहे.

4 / 6
भुईमूग, कापूस आणि एरंडीच्या लागवडीच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे खरीप हंगामातील लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला असून उत्पादन कमी आले.

भुईमूग, कापूस आणि एरंडीच्या लागवडीच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे खरीप हंगामातील लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला असून उत्पादन कमी आले.

5 / 6
हरियाणातील सुमारे 70 टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. देशात हरित क्रांती आणण्यात हरियाणाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. येथे गहू, तांदूळ, ऊस, सूर्यफूल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल लागवडीमध्ये देशात हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हे राज्य पशुपालनातही पुढे आहे.

हरियाणातील सुमारे 70 टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. देशात हरित क्रांती आणण्यात हरियाणाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. येथे गहू, तांदूळ, ऊस, सूर्यफूल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल लागवडीमध्ये देशात हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हे राज्य पशुपालनातही पुढे आहे.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.