AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या सात शहरांमध्ये झपाट्यानं वाढतायेत घराच्या किंमती, जाणून घ्या रिपोर्ट काय सांगतो?

आपल्या मालकीचं हक्काचं घर असावं असं सर्वांचं स्वप्न असतं. मात्र महागाईच्या जमा‍न्यामध्ये सर्वांनाच आपलं हे स्वप्न पूर्ण करता येतं असं नाही. यातच आता नुकताच एका रियल इस्टेट कंपनीचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या तीन महिन्यांत सात प्रमुख शहरांमधल्या घरांच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतातील या सात शहरांमध्ये झपाट्यानं वाढतायेत घराच्या किंमती, जाणून घ्या रिपोर्ट काय सांगतो?
| Updated on: Jun 26, 2025 | 9:55 PM
Share

आपल्या मालकीचं हक्काचं घर असावं असं सर्वांचं स्वप्न असतं. मात्र महागाईच्या जमा‍न्यामध्ये सर्वांनाच आपलं हे स्वप्न पूर्ण करता येतं असं नाही. यातच आता नुकताच एका रियल इस्टेट कंपनीचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या तीन महिन्यांत सात प्रमुख शहरांमधल्या घरांच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर तुम्हालाही घर खरेदी करायचं असेल तर जाणून घ्या, या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते?

घराच्या विक्रीमध्ये वीस टक्क्यांनी घट

देशातील प्रमुख सात शहरांमधील घराच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे घराच्या विक्रीमध्ये 20 टक्क्यांनी घट झाली आहे.रियल इस्टेट सल्लागार एनारॉककडून भारतातील सात प्रमुख शहरातील घरांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये घराच्या विक्रीमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये एकूण 96,285 घरांची विक्री झाली, तेच गेल्या वर्षी घराच्या विक्रीचं हे प्रमाण 1,20,335 यूनिट इतकं होतं.

कोणत्या शहरातील घरांच्या विक्रीमध्ये घट?

राजधानी दिल्ली, मुंबई शहर आणि उपनगर, बंगेळुरू, हैदराबाद, पुणे, आणि कोलकाता या शहरांमधील घराच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. मात्र दुसरीकडे चेन्नईमध्ये घराची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. याबाबत बोलताना एनारॉकच्या चेअरमन अनुज पुजारी यांनी म्हटलं आहे की, 2025 दुसऱ्या तिमाहीमध्ये रिअर इस्टेटचा बाजार काही प्रमाणात अस्थिर राहिला आहे, या काळात मोठ्या प्रमाणत चढ- उतार पाहायला मिळाले. सध्या जगावर युद्धाच सावट आहे. जगातील अनेक देश युद्धांमध्ये गुंतलेले आहेत, त्याचा परिणाम यावर दिसून आला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून घरांच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आता सध्या भारतामध्ये शांतता आहे, तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं देखील रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. घराची मागणी वाढल्यामुळे किंमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. भारतातील प्रमुख सात शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 11 टक्के तर सर्वाधिक दिल्ली एनसीआरमधील घराच्या किंमती तब्बल 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हैदराबाद, बंगळूरू आणि मुंबईमध्ये देखील घराच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Follow Us
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.