AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Generation : कॉर्पोरेट घराण्यांमध्ये नवीन पिढीचा उदय! नवीन मालक घेणार जबाबदारी

New Generation : भारतीय बिझनेस टायकूनची पुढची पिढी आता व्यवसायात उतरली आहे. कोर्पोरेट जगतात पण खांदेपालट सुरु आहे. आता अनेक उद्योगांचे प्रमुख निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्याठिकाणी नवीन मालकांची वर्णी लागत आहे.

New Generation : कॉर्पोरेट घराण्यांमध्ये नवीन पिढीचा उदय! नवीन मालक घेणार जबाबदारी
| Updated on: Sep 02, 2023 | 6:38 PM
Share

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : ‘आता आम्ही आरामाने बसून नवीन पिढी आमच्यापेक्षा कशी जोरदार कामगिरी करते हे पाहत त्यांचे कौतूक केले पाहिजे’, असे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी म्हटले होते. नवीन पिढीकडे धुरा सोपविण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी 2021 सालीच संकेत दिले होते. तेव्हापासूनच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जबाबदारी नवीन पिढीवर टाकण्यात येईल हे स्पष्ट झाले होते. या वक्तव्यानंतर अडीच वर्षांनी रिलायन्समध्ये (Reliance Industry) खांदेपालट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांच्या नवीन पिढीला संधी देण्यात आली. देशभरातील अनेक उद्योग घराण्यात हाच ट्रेंड सुरु आहे. आता नवीन पिढीने सूत्र हाती घ्यावी यासाठी नियोजन सुरु करण्यात आले आहे. भाकरी फिरवण्याचे संकेत अनेक उद्योजकांनी काही वर्षांपासूनच दिले आहे. त्यानुसार, नवीन पिढी (New Generation) घडविण्याचे काम सुरु होते. आता या नव्या पिढीवर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव्या पिढीवर भार

मुकेश अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशा, मुलगा आकाश आणि अनंत यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात सहभागी करुन घेतले. देशातील वेगवेगळ्या कॉर्पोरेट घरण्यातील पॅटर्न पाहाता अनेक उद्योगात नवीन पिढीच्या हातीच कारभाराची सूत्र असल्याचे दिसून येते.

हे मालक झाले निवृत्त

अनेक कॉर्पोरेट घराणे, मोठ्या कंपन्यांचे प्रमुख अगोदरच निवृत्त झाले आहे. यामध्ये एल अँड टीचे ए. एम. नाईक, एचडीएफसीचे दीपक पारेख, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांचा समावेश आहे. यामध्ये रतन टाटा, आदि गोदरेज, अजिम प्रेमजी, शिव नादर यांनी तर कधीचीच निवृत्ती स्वीकारली. त्यांना निवृत्त होऊन 10 वर्षांचा कालावधी लोटला.

हे पण घेणार निर्णय

या यादीत डॉ. प्रताप रेड्डी, आरसी भार्गव, नुस्ली वाडिया, बाबा कल्याणी, हर्ष मारीवाला, वेणू श्रीनिवासन, किरण मजूमदार-शॉ, पवन मुंजाल, अनिल अग्रवाल, आनंद महिंद्रा, नंदन नीलेकणि, अजय पीरामल, दिलीप सांघवी आणि सुनील मित्तल हे पण काही दिवसांत पूर्णपणे निवृत्त होतील अशी शक्यता आहे. अथवा हे दिग्गज त्यांच्या कामाचा भार हलका करतील.

नव्या पिढीला संधी

बजाज, अपोलो, भारत फोर्ज कंपन्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या सदस्यांनी कामास सुरुवात केली आहे. सिप्ला सारख्या कंपन्यांमध्ये पण उत्तराधिकारी समोर येत आहेत. महिंद्रा समूह, एशियन पेंट्स, मॅरिको आणि गोदरेज कुटुबांना यापूर्वीच कंपनी व्यवस्थापनात जागा देण्यात आली आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा