AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणामुळे आमिर खान-रिना दत्ताचा संसार मोडला? अखेर किरण रावने केलं स्पष्ट

कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये आमिर म्हणाला होता, "रिना आणि मी 16 वर्षे सोबत होतो. जेव्हा आम्ही विभक्त झालो, तेव्हा तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता." आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं.

'या' कारणामुळे आमिर खान-रिना दत्ताचा संसार मोडला? अखेर किरण रावने केलं स्पष्ट
आमिर खान, किरण राव, रिना दत्ताImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2024 | 8:42 AM
Share

मुंबई : 13 मार्च 2024 | किरण रावला डेट करण्याआधी अभिनेता आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरानंतर 2002 मध्ये आमिर आणि रिना विभक्त झाले. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता तब्बल 22 वर्षांनंतर किरणने या चर्चांवर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने स्पष्ट केलं की ‘लगान’च्या शूटिंगदरम्यान ती आमिरशी फार क्वचित बोलली होती. चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर 2004 मध्ये आमिर आणि किरण एकमेकांना डेट करू लागले होते.

“अनेकांना असं वाटतं की आमिर आणि माझ्या रिलेशनशिपची सुरुवात ‘लगान’ या चित्रपटापासून झाली. पण यात काहीच सत्य नाही. खरंतर ‘स्वदेस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्यावेळी तो ‘मंगल पांडे’ या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात करणार होता. आम्ही ‘कोक’ या ब्रँडसाठी आशुतोष गोवारिकरसोबत काही जाहिराती शूट केल्या आणि त्याचवेळी आमिर आणि माझ्यात जवळीक निर्माण झाली होती. हे सर्व ‘लगान’ प्रदर्शित झाल्यानंतर 3-4 वर्षांनी घडलं होतं. मी त्याच्या संपर्कातही नव्हते. किंबहुना ‘लगान’च्या सेटवर मी आमिरशी फार कमी बोलायचे. त्यावेळी मी दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होते. जेव्हा आमिर आणि मी 2004 मध्ये एकमेकांना डेट करू लागलो, तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की ‘लगान’च्या शूटिंगपासून आम्ही एकत्र आलो आणि त्यामुळे आमिरचा घटस्फोट झाला. पण यात काहीच तथ्य नाही”, असं किरणने स्पष्ट केलं.

याविषयी किरण पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करता, जो आधी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा त्यासोबत एक ओझं तुमच्या नात्यात येतं, ज्याचा परिणाम रिलेशनशिपवर होतो. मी कपल काऊन्सलिंगचा आवर्जून सल्ला देईन. आमिर आणि मीसुद्धा कपल काऊन्सलिंग केलं होतं. त्याठिकाणी तुमच्या गरजा आणि समोरच्या व्यक्तीला कोणत्या नजरेतून पाहता याविषयी स्पष्टता येते. या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे आमिर आणि मी एकमेकांशी प्रामाणिक राहण्यात खूप मदत झाली. कोणतीही परिस्थिती असली तरी आम्ही एकमेकांशी प्रामाणिक राहिलो.”

आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला. आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.