AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani: अँटिलियाचं ‘ते’ रहस्य, ज्यामुळे दीड वर्षांनंतर घरात शिफ्ट झालं अंबानी कुटुंब!

जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं. त्यांच्या भव्य घराची कायम चर्चा रंगलेली असते... अंबानी कुटुंबच्या अँटिलियाचं मोठं सत्य तुम्हाला माहिती आहे?

Mukesh Ambani: अँटिलियाचं 'ते' रहस्य, ज्यामुळे दीड वर्षांनंतर घरात शिफ्ट झालं अंबानी कुटुंब!
| Updated on: Jul 24, 2023 | 10:35 AM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं. अंबानी कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. दक्षिण मुंबईत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या भव्य घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. घरातील प्रत्येक वस्तू प्रचंड महागडी आहे. मुंबईत आलेल्या नव्या लोकांसाठी अँटिलिया केंद्रबिंदू आहे. अँटिलिया २७ मजल्यांची भव्य इमारत आहे. अँटिलियाचं बांधकाम २००४ साली सुरु करण्यात आलं.

अँटिलियाचं पूर्ण बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झालं. पण घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील जवळपास दीड वर्षानंतर अंबानी कुटुंब नव्या घरात रहायला गेलं. ज्यामुळे अनेक चर्चे रंगल्या. अँटिलिया तयार झालं असताना देखील अंबानी कुटुंबाने नव्या घरात गृहप्रवेश का केलं नाही… नक्की यामागे काय कारण आहे..

२०१० मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंबानी कुटुंबाने २०११ साली अँटिलियामध्ये प्रवेश केला. अंबानी कुटुंबाने दीड वर्षांनंतर अँटिलियामध्ये प्रवेश केलं, ज्यामुळे अनेक चर्चा रंगल्या. काही वास्तू अडचणींमुळे अंबानी कुटुंबाने दीड वर्षांनंतर नव्या घरात प्रवेश केला… असं अनेकदा सांगण्यात आलं.

अँटिलियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंबानी कुटुंबाने मोठी पूजा देखील घातली होती. ज्यासाठी ५० पंडितांना बोलावण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आणि वास्तू शास्त्रांच्या अफवांना फेटाळून लावलं.

अँटिलिया बांधण्यासाठी मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये एका मुस्लीम चॅरिटेबल ट्रस्टकडून जमीन खरेदी केली होती. अंबानी कुटुंबाचं घर अँटिलियाची चर्चा कायम चहत्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये रंगलेली असते. एवढंच नाही अनेक कौटुंबिक कार्यक्रम देखील अँटिलियामध्ये मोठ्या थाटात साजरे केले जातात. ज्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजक अँटिलिया याठिकाणी उपस्थित राहतात.

काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबात नव्या चिमुकलीचं आगमन झालं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नातीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. अंबानी कुटुंबाचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका मेहता यांनी दोन मुलं आहेत. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

तर अंबानी कुटुंबातील मुलगी ईशा अंबानी यांना देखील जुळी मुलं आहेत तर, अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रसिद्ध उद्योजकांची मुलगी राधिका मर्चेंड यांच्यासोबत अंबानी कुटुंबातील लहान मुलगा सप्तपदी घेणार आहेत. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.