AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Saumya Tandon | ‘गोरी मेम’ बनून सौम्य टंडनने गाजवला टीव्हीचा पडदा, आरोग्याची कारणं देत सोडली मालिका!

टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ‘भाभी जी घर पर है’ या टीव्ही मालिकेत ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता भाभी’ची भूमिका साकारून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज सौम्या तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Saumya Tandon | ‘गोरी मेम’ बनून सौम्य टंडनने गाजवला टीव्हीचा पडदा, आरोग्याची कारणं देत सोडली मालिका!
Saumya Tandon
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ‘भाभी जी घर पर है’ या टीव्ही मालिकेत ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता भाभी’ची भूमिका साकारून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज सौम्या तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

सौम्याचा जन्म 3 नोव्हेंबर 1984 रोजी भोपाळमध्ये झाला. ‘भाभी जी घर पर हैं’ या शोमधून सौम्या टंडनला वेगळी ओळख मिळाली आहे. पण, आता तिने या शोचा निरोप घेतला आहे. आज सौम्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगत आहोत. सौम्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने 2007 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ती करीना कपूरसोबत ‘जब वी मेट’ या चित्रपटात दिसली होती.

‘अनिता भाभी’ म्हणून मिळाली प्रसिद्धी!

सौम्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने अनेक रिअॅलिटी शो आणि मालिकांमध्येही काम केले. तिने ‘जोर का झटका’, ‘बोर्नविटा क्विझ’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ हे शो होस्ट केले आहेत. अनेक शो होस्ट केल्यानंतर तिने ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत काम केले. या शोमधली ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता भाभी’ ही तिची व्यक्तिरेखा खूप आवडली होती. या पात्राने अनिताला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एवढेच नाही तर, या व्यक्तिरेखेसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

आरोग्याचे कारण देत सोडली मालिका

ज्या शोमधून सौम्याला प्रसिद्धी मिळाली, आरोग्याचे कारण देत तिने हा शो सोडला होता. सौम्याने कोरोनाच्या काळात आपली तब्येत चांगली ठेवत शोला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना काळात शूटिंग सुरू झाल्यानंतरच ती शो सोडण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

मात्र, सौम्याने हे वृत्त चुकीचे म्हणत फेटाळून लावले होते. ती म्हणाली होती की, पैसे नाही तर, कोरोना आणि काही वाद होते, त्यामुळे मी या शोला अलविदा केला होता. एक कलाकार म्हणून मी हा निर्णय घेतला. मला वाटतं त्यामुळेच माझ्या टीमने मला समजून घेतलं. मी माझ्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम केले आणि प्रसूतीच्या 4 महिन्यांनंतरच कामावर परत आले होते. या शोसाठी पुन्हा शरीरयष्टी बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. कारण अभिनेत्री म्हणून ते खूप महत्त्वाचे होते.

हेही वाचा :

‘मन उडु उडु झालं’, दिवाळीचं निमित्त साधत ‘इंद्रा’ आणि ‘दिपू’ने घेतली राज ठाकरेंची भेट!

Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!

Ankita Lokhande : डेस्टिनेशन वेडिंग नाही तर ‘या’ ठिकाणी करणार लग्न, जाणून घ्या अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत कुठे घेणार 7 फेरे?

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.