Maharashtra Assembly Session 2026 LIVE: आज अधिवेशनात नरहरी झिरवाळांचं लाचखोरी प्रकरण तापणार?
Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांचं लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. अधिवेशनात आज काय काय होणार, त्याचे अपडेट्स जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES
-
जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवर गेलेल्या भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांची अंताक्षरी
बीच वरील फेरफटका, जंगल सफारी त्यानंतर आता हॉटेलवर एकत्र अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर. धाराशिवमध्ये निवडणूक निकालापासून भाजपसह मित्रपक्षांचे उमेदवार एकत्र सहलीवर. सहलीवरील उमेदवाराकडून मनोरंजनासाठी गाण्याचे बोल
-
नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रात्रीतून उभारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा
बीड तालुक्यातील नेकनूरमध्ये रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. नेकनूर येथील मिरची बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींकडुन गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ् आज अखेर शिवप्रेमींनी रात्रीतून नेकनूरमध्ये हा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं शिवप्रेमींकडुन आनंद व्यक्त केला जातोय तर नेकनूरच्या सौंदर्यात भर पडल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
-
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई
आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती, मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
-
अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दणका! स्थगिती आदेश रद्द
कथित फसवणूक प्रकरणात अंबानींना मोठा झटका. अनिल अंबानी विरोधात सुरू केलेल्या फसवणुकीच्या वर्गीकरणाच्या कारवाईला यापूर्वी एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश खंडपीठाकडून रद्द. बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांचे अपिल मंजूर. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांच्या फसवी वर्गीकरणावरून वाद न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या आदेशाला आव्हान. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्यासमोर सुनावणी
-
चंद्रपूर : शिवसेना उबाठाचे नगरसेवक मुंबईत दाखल
चंद्रपूर : शिवसेना उबाठाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेणार आहेत. उबाठाचे 6 नगरसेवक, 2 अपक्ष नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे आणि माजी जिल्हाध्यक्ष सतीश भिवगडे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
-
-
अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दणका! स्थगिती आदेश रद्द; बँकांच्या अपिलाला हिरवा कंदील
अनिल अंबानी यांच्या विरोधात सुरू केलेल्या फसवणुकीच्या वर्गीकरणाच्या कारवाईला यापूर्वी एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांचे अपिल मंजूर करण्यात आले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांच्या फसवी वर्गीकरणावरून वाद सुरू होता. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा बँकांनी केला होता. स्थगिती उठवल्याने अंबानींसमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
-
आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई
छत्रपती संभाजीनगर- आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती. मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. बंटीया समितीच्या आधी जी स्तिथी होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
-
-
बीड – माजलगाव तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा
बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तसंच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-
नाशिक – १५ मार्चनंतर शहरात रस्ता खोदकामाला बंदी
नाशिक – १५ मार्चनंतर शहरात रस्ता खोदकामाला बंदी करण्यात आली आहे. शहरातील २८ प्रमुख रस्त्यांवर सध्या एकाचवेळी कामे सुरू आहेत. एकाच वेळी काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दीर्घकालीन नियोजनाचा भाग असल्याने 15 मार्चपर्यंत सर्व केबल पाईप टाकण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. 15 मार्चनंतर खड्डे करण्यास लगाम लावला जाईल.
-
छत्रपती संभाजीनगर- टीईटी नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती नाही; अंतरिम आदेश मागे
छत्रपती संभाजीनगर- शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या याचिकांमध्ये टीईटी अर्हता निर्णायक ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठाने २० फेब्रुवारीचा अंतरिम आदेश मागे घेतला आहे. त्या अंतरिम आदेशानुसार झालेली पदोन्नतीची कार्यवाहीही न्यायालयाने अवैध ठरवली. टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी विचार करता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. नागपूर खंडपीठातील याचिकाकर्ते शिक्षक टीईटी पात्र होते. मात्र त्यांच्या नावांचा पदोन्नती यादीत समावेश झालेला नव्हता. औरंगाबाद खंडपीठातील याचिकांमधील शिक्षकांकडे टीईटी पात्रता नव्हती. त्यामुळे त्यांना पदोन्नतीचा लाभ देता येणार नाही, असा न्यायालयाचा निष्कर्ष आहे.
-
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती निर्माण झाली आहे. द्राक्ष सडल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अगोदरच उत्पादनात घट झाली आहे. त्यानंतर अवकाळी पावसाचं दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे.
-
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर; दादर परिसरातील AQI 150 पार
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली असून दादरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून AQI १५० पार गेला आहे. पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुक्याची चादर पहायला मिळतेय. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत सुरू असलेले मोठमोठे प्रकल्प, खाजगी बांधकाम आणि वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज (मंगळवार) दुसरा दिवस आहे. सोमवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान आणि शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या रुपाने मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. कारण विरोधक आज त्यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत. झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Feb 24,2026 8:20 AM
