AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची ज्वारी आणि सोयाबीन येणार भारताच्या बाजारपेठेत? व्यापार कराराबाबत अत्यंत मोठी अपडेट, थेट..

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. मात्र, यानंतरही भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यासाठी चर्चा करत आहे. अमेरिकेत होणारी जवळपास निर्यात बंद झाली. अमेरिकेला त्यांच्या शेतकऱ्यांसाठी भारतीय बाजारपेठ खुल्ली हवी आहे.

अमेरिकेची ज्वारी आणि सोयाबीन येणार भारताच्या बाजारपेठेत? व्यापार कराराबाबत अत्यंत मोठी अपडेट, थेट..
India-US trade
| Updated on: Dec 10, 2025 | 4:15 PM
Share

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. भारत फक्त आम्हाला त्यांच्या वस्तू निर्यात करतो. मात्र, अमेरिकेकडून काहीच खरेदी करत नाही, अशी ओरड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांची आहे. सध्या भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही गोष्टी भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणत आहे. मात्र, भारतीय शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच भारत अमेरिकेसोबत करार करत आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर व्यापार चर्चा पूर्णपणे बंद होती. भारत आम्हाला प्रतिसाद देत नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आज भारत आणि अमेरिकेत महत्वपूर्ण व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. भारत-अमेरिका कराराबद्दल अमेरिकेने मोठा दावा केला आहे.

आयएएनएसच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेत आतापर्यंतचा सर्वोत्तम पर्याय दिला आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये अमेरिकन शेतकऱ्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. ज्वारी आणि सोयाबीनसारख्या पिकांसाठी बाजारपेठ उघडण्याबाबत चर्चा सुरू आहे. याला भारत किती प्रतिसाद देतो हे पाहण्यासारखे ठरेल. कारण भारतीय शेतकरी मोठ्या संख्येने ज्वारी आणि सोयाबीनचे पिक घेतात.

अमेरिकेचे एक व्यापारी पथक सध्या नवी दिल्लीत आहे आणि काही कृषी मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. दोन्ही बाजूंनी व्यापार करार व्हावेत याकरिता प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेच्या मागून रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आले आणि काही महत्वाचे करार केले. मात्र, अमेरिका आणि भारतातील व्यापार करार पुढे जात नाहीत. अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे.

अमेरिकेने मान्य केले की, भारत काही मुद्द्यांवर सतर्क आहे. पण नवीन प्रस्ताव सर्वोत्तम आहे आणि आमच्यासाठी दुर्मिळ पोहोच दर्शवितो असे म्हटले आहे. यामुळे लवकरच भारत आणि अमेरिकेतील करार होतील, असे सांगितले जात आहे. अमेरिका भारताला मोठी बाजारपेठ म्हणून पाहतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना भारतासोबत करार करायची आहेत.

Follow Us
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!