AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Munir : पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरचे भारतीय कनेक्शन; जालंधर शहरातून कसे मिळाले शत्रू राष्ट्राला तीन जनरल

Asim Munir Jalandhar Connection : जालंधर मध्ये 85 टक्के मुसलमान होते 12 वसाहती होत्या. 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर मुस्लिम कुटुंब पाकिस्तानात गेली. तर काही येथेच थांबली. असीम मुनीरचे काय आहे जालंधर शहराशी कनेक्शन?

Asim Munir : पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरचे भारतीय कनेक्शन; जालंधर शहरातून कसे मिळाले शत्रू राष्ट्राला तीन जनरल
असीम मुनीरचे भारत कनेक्शनImage Credit source: गुगल
| Updated on: May 23, 2025 | 4:44 PM
Share

पाकिस्तान लष्कराचा फील्ड मार्शल असीम मुनीर याचे भारतातील जालंधर या शहराशी कौटुंबिक संबंध आहेत. स्थानिकांच्या दाव्यानुसार, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील फाळणीपूर्वी त्याचे कुटुंबिय जालंधर या शहरात राहत होत. या शहरातील काजी मोहल्लामध्ये मुनीर कुटुंबिय राहत होते. फाळणीनंतर हे कुटुंब रावळपिंडीला गेले. तिथेच असीम मुनीर याचा जन्म झाला.

पाकिस्तानातील अनेक सत्ताधारी आणि लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भारताशी थेट संबंध आहे. त्यांचे कुटुंबिय भारतातूनच पाकिस्तानमध्ये गेले होते. मुनीर पण त्याला अपवाद नाही. मुनीरचे शिक्षण रावळपिंडीत झाले. तो पुढे लष्करात गेला. एक एक पद पुढे सरकत तो आता पाकिस्तानचा लष्कर प्रमुख झाला आहे. पोकळ धमक्या देण्यात त्याने अनेकांच्या हातावर हात मारला आहे. तो पाकिस्तानचा वादग्रस्त लष्कर प्रमुख ठरला आहे.

मुनीरचे वडील होते शिक्षक

मुनीरचे वडील जालंधर येथे शिक्षक होते. त्याचे वडील स्थानिक मस्जिदीच्या विविध कार्यक्रमात भाग घेत. हे कुटुंब धार्मिकदृष्ट्या कट्टर होते. पाकिस्तान निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाशी पण त्यांचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. त्याविषयीचा पुरावा नाही. पण फाळणीवेळीच हे कुटुंब रावळपिंडीला रवाना झाले होते.

अनेक कुटुंब पाकिस्तानला

माध्यमातील बातम्यानुसार, काजी मोहल्ला आणि किला मोहल्ला हे शेजारी शेजारी होते. स्थानिक 79 वर्षीय हरप्रीत यांच्या मते 1947 च्या फाळणी वेळी अनेक कुटुंब काजी मोहल्ला सोडून पाकिस्तानला निघून गेले. त्यात मुनीर यांचे कुटुंब पण होते. रावळपिंडीत गेल्यावर मुनीरचे वडील मुख्याध्यापक झाले. एका स्थानिक मशिदीचे ते इमाम झाले. ते धार्मिक आणि शिस्तप्रिय असल्याचे सांगण्यात येते. विशेष पाकिस्तानमध्ये गेल्यावर सुद्धा ते जालंधरमधील त्यांच्या मित्रांच्या संपर्कात होते. काजी मोहल्लाशी संबंधित माहिती ते घेत असत.

जनरल याह्या खान याचे कुटुंब फाळणीपूर्वी अमृतसर आणि लुधियाना शहरात राहत होते. तर जनरल गुल हसन खान याचे पूर्वज करनाल आणि दिल्ली शहरात राहत असे. जनरल टिक्का खान याचा जन्म जालंधर शहरात झाला होता. या टिक्का खान यालाच 1971 च्या युद्धात ‘बुचर ऑफ बंगाल’ म्हटले जात असे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.