AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग
| Updated on: Nov 13, 2020 | 7:26 PM
Share

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. (Political movements increased in bihar meetings session started for forming government)

बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप, जनता दल यूनायटेड, हिंदुस्तान आवाम पार्टी आणि विकासशील इन्सान पार्टी या चारही पक्षांची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत एनडीएच्या गटनेत्याची निवड केली जाणार असून त्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापण्याचा दावा केला जाणार आहे.

सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीत गटनेता म्हणून नितीशकुमार यांच्या नावावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, रविवारी त्यांचा नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे.

याविषयी विचारले असता “रविवारी दुपारी साडे बारा वाजता एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होईल. या बैठकीत बाकीचे सर्व निर्णय घेतले जातील. नवे सरकार स्थापन करण्यासाठी काही औपचारिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. मंत्रिमंडळासाठी शिफारशीही राज्यापालांना पाठवल्या जातील. राज्यपालांनी या शिफारशी मान्य केल्यानंतरच नवं सरकार स्थापन करण्यावर विचार केला जाईल.” असं नितीश कुमार म्हणाले.

संबंधित बातम्या :

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

(Political movements increased in bihar meetings session started for forming government)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.