AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनावर मात करण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ पदार्थ, होतील अनेक फायदे !

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू देखील लावण्यात आले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी आहारात घ्या 'हे' पदार्थ, होतील अनेक फायदे !
| Updated on: May 01, 2021 | 5:43 PM
Share

मुंबई : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन देखील लावण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकजण कोरोना बाधित झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर आहारात नेमके काय घ्यावे हे अनेकांना कळत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोरोना झाल्यानंतर आपण आहारात नेमके काय घ्यावे. (Eat these foods during the corona period)

भाज्यांमध्ये विटामीन आणि खनिजांचे भरपूर प्रमाण असते, जे आपल्या शरीरात उर्जा निर्माण करते. यासाठी हंगामी भाज्यांचे भरपूर सेवन करा. यामुळे आपल्या शरीरातील विटामीनचे प्रमाण संतुलित राहते. तसेच आपल्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपई यासारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश करा. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.

पाणी हे शरीरासाठी वरदान आहे. जेव्हा तुम्ही रिकव्हर होत असता तेव्हा आपले डिहायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आपण नारळ पाणी, सरबत ही पिऊ शकता. दूध शरीरासाठी लाभदायी मानले जाते. दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. रोज रात्री झोण्यापूर्वी दूधामध्ये चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे आपली हाडे मजबूत होतील.

अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजारातून लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. तसेच, व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकच्या गोळ्या घेत रहा कारण यामुळे आपल्या शरीरातून विष बाहेर पडण्यास मदत होईल. लिंबूवर्गीय फळे शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवतात. जे संक्रमणाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. आपण आपल्या आहारात पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, बदाम, गाजर, रताळे, केळी, शेंगदाणे, सोयाबीन, टोमॅटो हे समाविष्ट करा .

पारंपारिक मसाले जसे हळद, आले आणि काळी मिरी त्यांच्या इम्युनोमोडायलेटरी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांकरिता ओळखले जाते. लवंगा, दालचिनी, वेलची यासारखे मसाले देखील शरीराच्या अनेक समस्या सोडवतात. या मसाल्यांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि अँटीऑक्सिडेंट असतात यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. रिकाम्या पोटी तुळशीचे सात-आठ पाने खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Eat these foods during the corona period)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.