AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लघवीकरून आल्यावर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य..? काय आहे नेमकं बरोबर… तज्ज्ञ काय देतात सल्ला..?

लघवी (Urine) करून आल्यावर लगेचच पाणी पिणे (Drinking Water) योग्य आहे की अयोग्य असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांचं उत्तर आम्ही पण शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही तज्ज्ञांशी बोललो.

लघवीकरून आल्यावर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य..? काय आहे नेमकं बरोबर... तज्ज्ञ काय देतात सल्ला..?
युरिन करून आल्यावर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य?
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 17, 2021 | 9:03 PM
Share

मुंबई : लघवीला जाताना पाणी प्यायला पाहिजे की लघवी करून आल्यावर पाणी प्यायला पाहिजे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तुम्ही जर लघवी करून आल्यावर लगेचच पाणी पित असाल तर सावधान. ही सवय करू शकते तुमचा घात. कारण ही सवय चुकीची असून तुम्ही आजाराला निमंत्रण देता.

निरोगी राहण्यासाठी गरजेचं 

दिवसभरात पाणी भरपूर पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पाणी पिणं हे निरोगी राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. असं म्हणतात पाणी भरपूर प्यायला पाहिजे त्यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. पण पाणी कधी, केव्हा प्यायला पाहिजे यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आपली एक चुकीची गोष्ट आपण आजाराला निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे लघवी (Urine) करून आल्यावर लगेचच पाणी पिणे (Drinking Water) योग्य आहे की अयोग्य असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांचं उत्तर आम्ही पण शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही तज्ज्ञांशी बोललो.

लघवीसंबंधित होऊ शकतात आजार

जर तुम्ही रोज लघवी करून आल्यावर लगेचच पाणी पित असेल तर थांबा.. पण कधी तरी करत असाल तर काही हरकत नाही. पण लगेचच पाणी प्यायला तर ही सवय चुकीची आहे. जर आपण रोज असं पाणी पित असेल तर लघवीसंबंधित आजार होऊ शकतात. तुम्हाला किडनी स्टोनची समस्या जाणवू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे चुकूनही अशी सवय लावू नका आणि असल्यास लगेचच बदला.

शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत

लघवीवरून आल्यावर किमान 10-15 मिनिटांनी पाणी प्यावं. तर लघवीला जाण्यापूर्वी पाणी प्यायला तर योग्य आहे. पण इथेही तुम्ही जर 10-15 मिनिटांपूर्वी पाणी प्यायला तर याचा चांगला फायदा होता. सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे आपल्या शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

…तर आजारांपासून दूर राहू शकतो

डॉक्टर किंवा आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण रोज 3-4 लिटर पाणी प्यायला हवं. शरीरात पाणी कमी झाल्यानेही आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते निरोगी शरीरासाठी कुठलीही गोष्ट अती किंवा कुठलीही गोष्ट कमी करू नये. प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात केल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

या सवयींमुळे होऊ शकतं ब्रेकअप… तुमच्यात आहेत का या सवयी? मग आजच दूर करा

केस धुतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चिकट होतात? मग हा सोपा उपाय करा आणि दिसा सुंदर

यंदाच्या हिवाळ्यासाठी स्टाइलविषयी टिप्स हव्यात? चला तर मग जाणून घेऊयात

Follow Us
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?