AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : विधानसभा निकालानंतर मराठी माणसावरचे हल्ले वाढले – संजय राऊतांचा आरोप

कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात. ही हिंमत?

Sanjay Raut : विधानसभा निकालानंतर मराठी माणसावरचे हल्ले वाढले - संजय राऊतांचा आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत
| Updated on: Dec 20, 2024 | 10:33 AM
Share

कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात. ही हिंमत? ज्या महाराष्ट्रामध्ये हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, त्याची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठीच हे केलं. अदानी, लोढा , गुंडेचा आणि सगळे इतर अमराठी बिल्डर यांच्या घशात मुंबईचा परिसर घालता यावा यासाठी मोदी, शाह , फडणवीस आणि त्यांच्या गोतवाळ्याने मराठी माणसाला कमजोर केलंय, असं राऊत म्हणाले. विधानसभा निकालानंतर मराठी माणसावर होणारे हल्ले वाढायला लागले आहेत , असा आरोपही राऊत यांनी केला.

कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर अमराठी लोकांनी निर्घृण हल्ला केला, त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.

स्वत:ला जे शिवसेना समजणारे नामर्द लोक सरकारमध्ये बसलेत

स्वत:ला जे शिवसेना समजतात, मोदी-शहांनी ज्यांच्या हातात शिवसेना आणि चिन्हं दिले, ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत, त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचत्ये का? असा थेट सवाल विचारत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. ते लोक नामर्द आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी मराठी माणसाचं नुकसान केलंय, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडलं.

मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान 

मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार, हद्दपार करायचं हे फार मोठं कारस्थान आहे. काल कल्याणमध्ये मराठी माणसावर जो हल्ला झाला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहेकाय अवस्था आहे मराठी माणसाची ?  . या सगळ्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घेण्याची लाज वाटली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.