AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election : मुंबईत श्रेय चोरणारी टोळी… अबोध बालकं… CM फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Devendra Fadnavis : आज वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप त्यांनी केला.

BMC Election : मुंबईत श्रेय चोरणारी टोळी... अबोध बालकं... CM फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात
Thackeray and FadnavisImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 03, 2026 | 9:49 PM
Share

मुंबई महानगर पालिकेच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. आज वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा उल्लेख अबोध बालके असा केला. तसेच इतरही अनेक मुद्द्यांवरून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडला आहे, आज तिथीने आई जिजाऊंची जयंती आहे. आई जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवछत्रपतींना तयार केलं होतं. आज क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले यांचीही जयंती आहे. या खास दिवशी प्रचाराला सुरुवात करत आहोत.

मुंबई नव्हे तुमची बुद्धी सरकत आहे…

14 -15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे, या दिवशी आपल्याला चमत्कार घडवायचा आहे. ही निवडणूक मुंबईच चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलण्याची आहे. आता दाणा पाणी वाल्यांनी त्यांचा ठिकाणा कुठे आहे ते दाखवायचं आहे. मी मुंबईमध्ये उतरत होतो तेव्हा मुंबई कुठे गेली का? कुठे सरकली का हे पाहत होतो. मात्र मुंबई कुठे गेलेली नव्हती. मुंबई सरकत नाही, निवडणूक आली की काही लोकांना वाटतं मुंबई उत्तरेकडे सरकते. मुंबई नव्हे तुमची बुद्धी सरकत आहे.

मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही…

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्या सोबत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे आहे. मुंबईकर जागा झाला आहे. ठाकरे एकत्र आलेत, आता तुमचं काय होणार, तुम्ही कसं लढणार? असं मला विचारण्यात आलं. देखकर धुंदलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता; झुटी आँधियोंसे वही डरे जिन चिरागों में दम नही होता.

मुंबईमध्ये श्रेय चोरणारी टोळी…

आपल्या भाषणात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मला तर आता लक्षात आलं आहे, मुंबईमध्ये श्रेय चोरणारी टोळी आहे. यात काही अबोध बालके देखील आहेत. ते म्हणतात मुंबईचा विकास आम्ही केला. मात्र मेट्रोचं काम, कोस्टल रोड, बीडीडी चाळ ही कामे आम्ही केली आहेत. मात्र विकासात खोडा घालण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण