AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरएसएसच्या कार्यक्रमातून माघार ?, सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई यांनी काय म्हटले ?

मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले आहे, पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते असेही कमलताई गवई यांनी म्हटले आहे.

आरएसएसच्या कार्यक्रमातून माघार ?, सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई यांनी काय म्हटले ?
kamaltai gavai and cji bhushan gavai
| Updated on: Oct 01, 2025 | 7:56 PM
Share

अमरावतीत येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला आपण प्रकृतीच्या कारणास्तव जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अखेर स्पष्ट केले आहे. आपले वय आता ८४ झाले असल्याने प्रकृती बरी नाही, त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे कमलताई गवई यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. या संघाच्या कार्यक्रमाला कमलताई गवई जाणार असल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये अस्वस्थता होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अमरावतीत आरएसएसचा येत्या ५ ऑक्टोबरला एक सोहळा आहे. हा सोहळ्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई या जाणार असल्याची एक निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमातून व्हायरल होत होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या यावरुन नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर या कार्यक्रमाला आपण जाणार नाही असेही कमलताई गवई यांच्या हस्तलिखित पत्र व्हायरल होऊ लागले होते. त्यानंतर हे पत्र खोटे असून त्या या कार्यक्रमाला जाणारच आहेत असे सांगितले गेले होते. आता पुन्हा कमलताई गवई यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण या कार्यक्रमला उपस्थित राहू शकणार नसल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

अमरावतीत ५ ऑक्टोबरला RSS चा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कमलताई गवई यांचे नाव समाविष्ठ असल्याची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमात व्हायरल केली जात होती. त्यानंतर आंबेडकरी समाजाकडून या संदर्भात टीका केली जात होती. अखेर आता कमलताई गवई यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

…तरी आंबडेकरी विचारच मांडले असते

RSSच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचं नाव असल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर कमलताई यांनी पत्राद्वारे आपले मत मांडले आहे. माझं वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही, त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले आहे, पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते असेही कमलताई गवई यांनी म्हटले आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत