AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर; आज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले…

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोवर निवडणुका होऊच शकत नाहीत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगेंनी नेमकं काय म्हटलंय? आगामी निवडणुकीवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

काल विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर; आज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले...
| Updated on: Feb 21, 2024 | 11:19 AM
Share

अंतरावली सराटी, जालना | 21 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण विधेयक काल विधानसभेत आणि विधानपरिषदेत संमत झालं. या विधेयकानुसार मराठा समाजाला राज्य सरकारी नोकरीमध्ये आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. मात्र या सगळ्याला मनोज जरांगे पाटील यांचा विरोध आहे. आज जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जाणून बुजून आणि मुद्दामून सरकार ही उपोषणाची वेळ आणत आहे. काल त्यांनी विषय घ्यायला पाहिजे होता. सामजाची दिशा, म्हणणं ओबीसी आरक्षणाची आहे. त्यांनी जर पालकत्व स्वीकारलं असेल तर त्यांना पश्र्चाताप झाला असावा. 12-1 वाजेपर्यंत दिशा फायनल होईल, असं मनोज जरांगे म्हणाले.

जरांगे पाटील काय म्हणाले?

राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही खेळी केली आहे. ते त्यांना लय गरजेचे आहेत. हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं असेल. शहाणे असतील तर त्यांनी कालच्या मॅटरवरून लक्षात घ्यावं. त्यांनी मनाने म्हणलं पाहिजे. लोकांचं विश्वास आहे. विश्वास घात होईल असं वागू नये. आम्ही वाशीत सांगितलं होतं की, गुलालाचा अपमान करू नका. त्यांनी स्वतः सांगावं कोण आरक्षण देऊ देत नाहीयेत किंवा सांगावं की मीच देत नाहीये, असंही जरांगे पाटील म्हणाले.

जरांगेंचा सरकारवर घणाघात

ते टिकेल की नाही त्यात आम्हाला पडायचं नाहीच आहे. आम्हाला जे पाहिजे ते द्या ना. आधीच्या नियुक्त्या दिल्या तर बरं होईल. 350-400 लोक आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला होता. हैद्राबाद गॅझेट घेणं म्हणजे काय परदेशातील काम नाहीये. लय मोठा विषय नाहीये. तुम्ही लोकांना सांगण्यासारख केलं तरी काय? कालच्या अधिवेशनात जनतेचा फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, असं मनोज जरांगे म्हणाले.

निवडणुकीवर काय म्हणाले?

तुम्ही दोन्ही दिलं असतं ना तर, 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. त्यांना परत 106 सारखे निवडून आणायचे आहेत म्हणून असं करत आहेत. येवढं मोठा मुद्दा असताना निवडणुका घेऊच शकत नाहीत ते, असं म्हणत मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.