AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? आता…मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर

Manoj Jarange attack on Ladaki Bahin Yojana : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणक 2024 पूर्वी धुराळा उडवून दिला. आज त्यांनी दलित-मुस्लिम, मराठा समाजाची निवडणुकीसाठी मोट बांधण्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर थेट हल्लाबोल केला. काय म्हणाले जरांगे पाटील?

१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? आता...मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर
| Updated on: Oct 31, 2024 | 3:35 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पूर्वची बार उडवून दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आज त्यांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली त्यात दलित-मुस्लिम, मराठ्यांची एकत्रित मोट बांधण्याची घोषणा केली. त्यामुळे येत्या विधानसभेत समीकरणं बदलण्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता राज्य सरकारवर निशाणा साधला.

आता परिवर्तन होणार

तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं. ओबीसी, दलित, मराठ्यांना काय दिलं. ७५ वर्षापूर्वी विजेचा पोल टाकला. तो अजूनही तसाच आहे. तोही बदलला नाही. साधी कर्जमुक्तीही केली नाही. एक रुपयांचा पीक विमा गेला कुठे. हप्ते न भरल्याने पीक विमा देऊ शकत नाही असं कंपन्या म्हणतात, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही १५०० रुपये देऊन नादी लावत आहोत का? आता परिवर्तन होणार. सहन करण्याची क्षमता संपली. सुपडा साफ करणार म्हणजे करणार. सोडणार नाही. चिन्ह मिळाल्यावर आम्ही बोलू, असे ते म्हणाले.

आता 3 नोव्हेंबरला उमेदवार आणि मतदारसंघाची घोषणा

शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. मराठा, धनगर आणि ओबीसींचं वाटोळं केलं. विरोधक नव्हते तरीही त्यांनी आमच्यावर त्यांनी वार करायला नको होतं. हिन वागणूक द्यायला नको होती. आमच्या जनतेला त्रास दिला म्हणून हा उठाव झाला. आम्ही जागांच्या लफड्यात पडणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने जाणार आहोत. आम्ही कुणाला दादागिरी करणार नाही. तुम्ही उभं राहतं तसं आम्ही उभं राहणार नाही. कोण उभा राहील कोण नाही हे आम्ही ठरवणार. आचारसंहितेचे नियम पाळून काम करायचं आहे. गरीब माणूस उभा राहत असेल तर त्याला रोखू नका. तुम्ही मतदारांपर्यंत जा. आम्ही जाणार आहोत. धमकावू नका.

३ तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहोत. ४ तारखेला अर्ज मागे घेण्यात येईल. ज्यांना अर्ज मागे घ्या सांगितलं तर त्यांनी अर्ज मागे घ्यायचा. एकच उमेदवार राहील. बाकींच्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम करायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.