मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra Mumbai Rains Live Update) जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. अजून पाच दिवस राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवाफमान खात्याने (IMD Update) व्यक्त केली आहे. मुंबईतल्या माटुंगा, सायन, कुर्ला, दादर, अंधेरी, बांद्रा (Heavy Rain in Mumbai City) परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पाणी साचले आहे. कोकणात (Kokan Heavy Rain Update) काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील रेल्वे सेवेवरती सुध्दा (local train status mumbai) पावसाचा परिणाम झाला असून रेल्वे संथगतीने सुरू आहे. मुंबईतल्या विक्रोळी परिसरात सकाळी एक दरड कोसळली (Land Slide) आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सध्या या भागात मदतकार्य पुरवत आहेत, पावसाची प्रत्येक अपडेट…
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे दापोली तालुक्याला पावसाने झोडपले आहे. दापोली तहसिलदार कार्यालयाबाहेर मोरी पाण्याखाली गेली आहे. तहसील कार्यलया नजीकची मोरी पाण्याखाली गेली आहे.
जळगावात मुसळधार पाऊस झाला. या धुवाधार पावसामुळे परिसरातील गेल्या दोन दिवसापासून त्याचबरोबर शहरात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले झाडाच्या फांद्या पडल्याने रस्त्यावर वाहन चालवण्यास कसरत करावी लागत आहे काही भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना जीवनदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्येही आनंद पहावयास मिळाला तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने ग्रामस्थांचे पाण्यातून वाट काढताना हाल झाले.दरम्यान असाच पाऊस अजून सलग दोन ते तीन दिवस आल्यास पिकांची चांगली वाढ होईल असे मत बळीराजा कडून व्यक्त लागल्याचे पहावयास मिळाले.
मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी
रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकू नये- महापालिका प्रशासनाच्या सूचना
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्युची नोंद झालीय, या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात...तसेच, बीचवर पोहण्यास जातात
त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असतांना कोणीही समुद्रकिनारी , बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आलाय
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचा फटका पालघर मधील शेतकरी आणि स्थानिकांना बसू लागला आहे . महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या माती भरावाने नैसर्गिक नाले बुजवले गेले आहेत . पालघर मधील नवघर घाटीम येथे नैसर्गिक नाला फुटल्याने नाल्याच पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालं आहे . केंद्र सरकारच्या मुंबई वडोदरा या द्रुतगती महामार्गाच काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे . मात्र या महामार्गाचा माती भराव करण्याकरता अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक नाले बुजवण्यात आल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याने आपला प्रवाह बदलला आहे . त्यामुळे येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास पालघर मधील शेतकऱ्यांच मोठं नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे .
हिंगोली जिल्ह्यात काही भाग वगळता आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तर उगवलेल्या पिकांना ही नवसंजीवनी मिळाली.
- मुक्त विद्यापीठाचा पेपर देवून 8 मुले गेली होती विरचक्क धरणात पोहायला
- यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू
- गाळाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
- धरण परिसरात परिवाराचा आक्रोश
उल्हास नदी ही पुणे जिल्ह्यात उगम पावून पुढे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात वाहात येते. गेल्या काही दिवसात घाटावर आणि रायगड, ठाणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झालीये. उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी असून सध्या नदीची पातळी १४.३० मीटरवर पोहोचली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात उल्हास नदीला मोठा पूर येतो आणि त्याचा फटका बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागाला बसतो. यंदाही गेल्या २ दिवसातल्या पावसामुळे उल्हास नदीनं अक्राळविक्राळ रूप धारण केलं असून बदलापूरची उल्हास नदी चौपाटी ही पूर्णपणे पाण्याखाली गेलीये. त्यात पुढील काही दिवस ठाणे आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त होतेय.
मात्र नरेंद्रनगर ब्रिजमध्ये साचलं मोठ्या प्रमाणात पाणी
ब्रिजच्या खाली पाण्यात पडला एक ट्रक आणि मिनी डोर बंद
तर एक स्कुल बस सुद्धा बंद पडली
ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला रात्रीच एक खांब पडला त्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहतूक सुद्धा बंद
नागरिकांना ब्रिज बंद असल्याने मोठा त्रास
महापालिकेची झाली पोल खोल
ट्रक बाहेर काढण्यासाठी बोलाविण्यात आली क्रेन
गावकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी मार्ग बंद आहे, या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने शाळकरी मुलांनाही याचा फटका बसत आहे.
सकल भागातील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी ओसरायला सुरवात.
सिंधुदुर्गात आजही हवामान विभागाचा अंदाज पावसाने चुकवला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस लागला नसला तरी समुद्र मात्र दुपार नंतर खवळलेला पाहायला मिळाला. मालवण जेटी येथील ही दृश्ये असून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. आजपासून तीन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता मात्र मुसळधार पावसाने दडी मारलेली पहायला मिळाली. आज सकाळ पर्यंतच्या मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 50 मिमी पावसाची नोंद झाली होती. कालही सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी झाला होता त्यालाही पावसाने चकवा दिला होता.
रेल्वे सेवा विस्कळीत झाली होतीय त्यानंतर मोटरमन यांनी काळजी घेत ट्रेन थांबवली. आज दोन तासाचा स्पेशल मेगा ब्लॉक घेऊन भिंत हटवण्याचे काम करण्यात आलं आहे आणि ट्रेन सेवा सुरळीत करण्यात आली आहे.
इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज इचलकरजी महापालिकेमध्ये सर्व शासकीय बैठक घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापुरासंबंधी सूचना केल्या. यावेळी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन, महावितरण प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील व रखडलेल्या गटार खोदाई प्रश्नी नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण शहरात येत नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला फैलावर घेतले. ठेकेदाराच्या हातात असलेली फाईल आमदारांनी काढून घेत “फाईल कसल्या फिरवतोस तोंडात मारून देईन" असा आक्रमक पवित्रा आमदार नाईक यांनी घेतला. शांत स्वभावाच्या वैभव नाईक यांचा हा आक्रमक अंदाज पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला .
नांदेडमध्ये आज पावसाचे दमदार आगमन झालंय, जिल्ह्यात बहुतांश जागी आज पाऊस जोरदारपणे बरसलाय. आजच्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आता या पावसानंतर यापुढे खरीप हंगामाच्या कामाची शेतकऱ्यांची लगाबग वाढलेली दिसणार आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असली तरी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आज दुपारनंतर माजलगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. माजलगाव, दिंद्रुड, वडवणी यासह परिसरात समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर अनेक ठिकाणी आजही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बहुतांश ठिकाणी लवकर पेरण्या केल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर आजही अनेक भागातील पेरण्या कोळंबल्यात, त्यामुळे बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
कोकणातील पाऊस आणि पुरपरिस्थिबद्दल प्रशासनाची बैठक लावून उपाययोजना कराव्यात
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली मागणी
कोकण आणि महाड अतीवृष्टी दौऱ्याहून परतल्यानंतर लिहील पत्र
वसई विरार मधील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात ही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. वसईच्या पश्चिम पट्टीतील ग्रामीण भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे. वसईच्या गिरिज, देवतालव, बंगली रोड, गास, निर्मळ, सत्पाला, वटार इत्यादी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे काही ठिकाणच्यां रिक्षा आणि पालिकेच्या परिवहन सेवेच्या वाहतूकीवरही परिणाम झाले आहेत.
वसईत पुराच्या पाण्याने वाहून आलेला एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
राहुल नंदलाल विषवकर्मा असे या 17 वर्षाच्या मुलाचे नाव असून तो वसईच्या गावाराई पाडा येथील रहिवासी आहे.
सोमवारी हा तरुण वसईच्या वालीव भागातील कंपनीत कामाला गेला होता. सायंकाळी 7 वाजता तो कंपनीतून बाहेर पडल्या नंतर तो घरी पोहचण्याऐवजी बेपत्ता झाला होता.
बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास वसईच्या मधूबन परिसरातील लोखंडी ब्रिज जवळ नाल्यात वाहत आलेला त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे.
वरई-विरारमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडलाय. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
रिमझिम स्वरूपात सुरू असलेला पाऊस आता चांगला बरसायला लागला
रखडलेल्या पेरण्यांसाठी लाभदायी ठरणार पाऊस
विजांच्या गडगडाटसह पाऊस सुरु
हवामान ख्यात्याचा अंदाज काय? हेही ऐका
7 July: सक्रिय मान्सून राज्यात ... राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता. कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस. मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि - IMD Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022
नागपूरच्या काही भागात ढगांच्या गडगडाटसह मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. चांगल्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्यात जरी पर्याटकांना अशोका धबधबा खुणावत असला तरी अद्याप हा अशोक धबधबा पर्यटकांसाठी खुला केलेला नाही यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होऊन परत जात आहे . दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले ही निर्सग रम्य ठिकाणी वळतात मात्र असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्याकडे जाणारे मार्ग वन विभागाने बंद केले आहेत .
पालघर तालुक्यातील सफाळे पुर्व भागातील नवघर-घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई- बडोदरा एक्सप्रेस वे कामामुळे नैसर्गिक नाला बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गावड पाड्यात घुसण्याची शक्यता आहे. मुंबई-बडोदरा एक्सप्रेस वेच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून जीआर इन्फा प्रोजेक्ट्स या कंपनीने भराव टाकून नैसर्गिक नाले बंद झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला शेती मोठ्या प्रमाणात असल्याने वर्षभरासाठी उदरनिर्वाहसाठी कुठलेही नसल्याने शेतकऱ्यांना शेतीवर अवलंबून राहावं लागते. या नाल्याच्या दोन्ही बाजूला आदिवासी व बिगर आदिवासी असे 30 च्यावर शेतकऱ्यांची शेती असुन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. नैसर्गिक नाला बंद केल्याने गावात पावसाळ्यात पावसाचे पाणी गावात शिरण्याची ही शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्याना पुर आले आहेत.
शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्यात जरी पर्याटकांना अशोका धबधबा खुणावत असला तरी अद्याप हा अशोक धबधबा पर्यटकांसाठी खुला केलेला नाही यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होऊन परत जात आहे . दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले ही निर्सग रम्य ठिकाणी वळतात मात्र असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्या कडे जाणारे मार्ग वन विभागाने बंद केले आहेत .
पुढचे काही दिवस कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून कोकण भागाला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम या तैनात आहेत. सध्या सावित्री नदी ही धोक्याच्या पातळीखाली आहे. त्यामुळे महाड शहराला कोणताही धोका नाही. परंतु जर परिस्थिती बिघडली तर महाडकरांना कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात एनडीआरएफ टीमकडून मॉकड्रिल करण्यात येत आहे..
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन
"भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे," असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
Today’s High Tide: 17:31hrs-3.75mtr Low tide :Dt 08.07.2022: 0:009hrs- 1.51mtr https://t.co/GHkhIFgM9G
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 7, 2022
रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 125 मि.मी. पावसाची झाली नोंद
अलिबाग - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 125.45 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 963.17 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 007.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 125.45 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 31.06 टक्के इतकी आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.7 जुलै 2021 रोजी सरासरी 2.82 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जून पासून 7 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 008.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.
नवी मुंबई गेल्या 24 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे
मोरबे धरणाची पातळी देखील 71 मीटर एवढी झालेली आहे, बऱ्यापैकी पाऊस या क्षेत्रात पडला आहे
त्यामुळे नवी मुंबईकरणात पाण्याची चिंता ही आता मिटलेली आहे
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 07/07/2022 1)वसई:- 127मी मी 2)जव्हार:- 62.66मी मी 3) विक्रमगड:- 113.5मी मी 4) मोखाडा:- 60.4मी मी 5) वाडा :- 135.75 मी मी 6)डहाणू :- 94.02मी मी 7) पालघर:- 79.07मी मी 8) तलासरी :- 41.75मी मी एकूण पाऊस :- 714.15मी मी एकुण सरासरी 89.27मी मी
एनडीआरएफ च्या टीमने प्रयागसंगमावर केली पाहणी
प्रयाग संगम हा पंचगंगा नदीच उगम स्थान
एनडीआरएफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला पावसाचा आढावा
सध्या पावसाचं प्रमाण कमी त्यामुळे धोका नाही
मात्र नऊ तारखेपर्यंत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
सध्या गरज नसली तरी आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ च्या आणखी टीम बोलावणार
एनडीआरएफ चे सहाय्यक कमांडर प्रवीण धत यांची माहिती
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू होतेय वाढ, पाणी पातळी 32 फुटांवर आली आहे
दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरु आहे
नालासोपारा परिसर कालपासून जलमय झाला आहे. दोन दिवसांपासून तिथं मुसळधार पाऊस सुरु आहे...
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अंधेरीतील सबवेत कालपासून पाणी आहे...
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नालासोपारा परिसर एकदम जलमय झाला आहे.
वसई ते वसई फाटा महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी
रस्त्यावर बस बंद पडल्याने ट्रॅक्टर ला बांधून काढली बाहेर
तर त्याच बाजूला एक श्वान सुद्धा पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे
महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालापूर खोपोली महामार्गचे काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले होते.खालापूर खोपोली व खोपोली खालापूर असा प्रवास करताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक यांना खडड्यांमधुन वाहन चालवावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे तात्काळ सबंधीत यंत्रणा यांनी याची तात्काळ दखल घेऊन तात्पुरती का होईना रस्त्याची डागडुजी करून खड्डे भरण्याची मागणी केली जात आहे.
हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडले
हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 4 हजार 378 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा
रस्त्यावर गुडगाभर पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहन बंद पडत आहेत..
पाणी साचल्याने अनेक रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी, औषध आणण्यासाठी ही पायपीट करत जावे लागत आहे.
नालासोपारा पूर्व आचोळा रोड वरून साचलेल्या पाण्यातून आढावा घेऊन रुग्णालयात पायपीट
- वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद,
- महाड ते पंढरपुर या महामार्गावरील धोकादायक असलेला वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत बंद,
- ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद असणार,
- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले निर्देश,
-पुणे-पिरंगुट-मुळशी- ताम्हिणी घाट- निजामपूर-माणगाव- महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश.
नवी मुंबईत रिमझिम पाऊसाला सुरवात
वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे
सर्वीकडे अंधार देखील मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे
नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी र
अमरावती जिल्ह्यात 1100 घरात घुसले पुराचे पाणी...दीड हजार नागरिकांचे स्थलांतर
426 घरांची पडझड 5 हजार हेक्टर वरील पिके अतिपावसामुळे बाधित....
पावसाचा अमरावती, तिवसा, चांदुर बाजार,चिखलदरा व धामणगाव रेल्वे तालुक्याला फटका...
महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आला समोर...
पावसामुळे शेतातला आले आहे तलावाचे स्वरुप....
वसई विरार नालासोपारा जलमय झाला आहे
नालासोपारा पूर्व स्टेशन रोड ते सेंट्रल पार्क ओसवाल नगरी, आचोळा रोड, वसई नवजीवन, वालीव, सनसिटी रोड, विरार विवा कॉलेज रोड, स्टेशन ते बोलींज रोड वर पाणीच पाणी झाले आहे..
सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शहरातील शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे..
रेल्वे ट्रक वर कुठेही पाणी साचले नसल्याने, विरार वुन चर्चगेट ते चर्चगेट वुन विरार कडे धावणाऱ्या सर्व लोकल मात्र सुरळीत सुरू आहेत..
सकाळ च्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना गुडगाभार पाण्यातून मार्ग काडावा लागत आहे
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पावसाने बॅटिंग केली असून सकाळ च्या वेळेत मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे
कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ही पावसाची संततधार सुरू असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . काल रात्री पावसाने चांगलीच बॅटिंग केली मात्र आज पहाटे पासून कल्याण डोंबिवली परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने कुठल्याही सखोल भागात पाणी थांबले नाही मात्र गेले चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे हवेत चांगलंच गारवा जाणवत आहे
- गेल्या 24 तासात लोणावळ्यात 146 मिमी (5.75 इंच) पावसाची नोंद झालीय
-मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस झालाय
-यावर्षी आजपर्यत 727 मिमी (28.62 इंच) पाऊस झालाय
महाराष्ट्र | रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर:
Maharashtra | Red alert issued for Raigad, Ratnagiri & Sindhudurg till July 9, while Palghar, Pune, Kolhapur & Satara are on red alert till July 8. Mumbai & Thane are on orange alert till July 10: IMD pic.twitter.com/UWMip78mzs
— ANI (@ANI) July 7, 2022
पुणे - नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार केलेल्या खेड घाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी दिसून येत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे . या रस्त्याचे काम काही ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला असला ; तरी अद्यापही अनेक ठिकाणी हा धोका कायम आहे काही ठिकाणी दरड कोसळून अपघात होण्याची भीती आहे.
गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पड़त असल्याने काल रात्रि पासून गोसीखुर्द धरणाच्या(Open gate) उघड़े असलेल्या 2 दरवाज्यात आणि भर पड़ली असून आता गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघड़ण्यात आले आहे।विशेष म्हणजे या वर्षिच्या मानसून सेशन मध्ये पहिल्यांदा हे धरणाचे दरवाजे उघड़े करण्यात आले आहे।तर या पाच दरवाज्यातुन 695.86 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे।यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठीला गावाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे।
सर्वाधिक पावसाची साकोली तालुक्यात नोंद.
जिल्ह्यात आतापर्यंत 230.9 मिमी पाऊस.
गत २४ तासात जिल्ह्यात 6.2 मिमी पावसाची नोंद.
रखडलेली रोवणीची कामे आता वेगाने सुरू झाल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
आज पुन्हा सकाळी मुसळधार पाऊस असल्याने अंधेरी येथील सबवेमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले
#WATCH | Maharashtra | Andheri Subway waterlogged in Mumbai as rain continues to lash the city pic.twitter.com/7kiRhDVjel
— ANI (@ANI) July 7, 2022
NDRF च्या टीम रत्नागिरीच्या गावामध्ये जाऊन पाऊस आणी परिस्थितीचा आढावा घेतला
रत्नागिरीत मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस
कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे
मुंबई जोरदार पावसाची सुरुवात कांदिवली मलाड गोरेगाव जोगेश्वरी एक तासापासून संततधार पाऊस पडत आहे
राज्यात कुठे किती पाऊस पडणार जाणून घ्या
दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
Mumbai Rainfall update:Intense spells of rainfall very likely over parts of Mumbai Thane Raigad and Palghar during next 3-4 hours. Ghat areas of Pune and Satara also to receive moderate to intense spells of rain. pic.twitter.com/602iVf0zMZ
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 6, 2022
काञज जुन्या बोगदा येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने तसेच महापालिका कर्मचारी आणि पाटबंधारे विभागाकडून जेसीबीची मदत घेऊन घटनास्थळी पोहोचले. सद्यस्थितीत रस्त्यावर आलेले मोठे दगड बाजूला करत काम पुर्ण केले असून तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी
मुंबईत रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने अंधेरी सबवे मध्ये पाणी भरला आहे. मात्र इथे सांचलेल्या पाण्याचा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे
मुंबईच्या मलबार हिल परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे
डोंगराळ भाग असल्या कारणाने इथे पाणी सांचलेला नाही
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत निवास स्थान आणि जवळपासच्या परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मुंबईसह उपनगरातील बांद्रा, अंधेरी, गोरेगांव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
अंधेरी सबवे, मालाड सबवे सह अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्याचबरोबर काल झालेल्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचले होते
सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून ndrf चे पथक तैनात करण्यात आले आहे. 22 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल. नागरिकांनी खबरदारी व सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.
9 जुलै पर्यंत घाट राहणार बंद
दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे वाहतूक ठेवली जाणार बंद
प्रशासनाने काढला आदेश
अवजड वाहन प्रमाणेच छोट्या वाहनांसाठी देखील परशुराम घाट बंदच
वसई विरार नालासोपारा परिसरातील पूरजन्य परिस्थितीचा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रत्येक ठिकाणाला भेटी देत पाहणी करून आढावा घेतला आहे.
महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या हॅजमेट वाहनातून ही पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचीही समावेश होता.
वसई विरार नालासोपाऱ्यात मागच्या 3 दिवसात सलग मोठ्याप्रमाणात पाऊस झाला आहे.
आज एका दिवसात 217 मिलिमीटर पाऊस शहरात पडला आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, जलमय होऊन सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.
अनेक सोसायटीच्या तळमजाळ्यातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन ही विस्कळीत झाले होते.
महापालिकेने केलेल्या उपाययोजना, सध्याच्या पुरपरिस्थितीत कितपत कार्यान्वित आहे. नागरिकांच्या समस्या काय आहेत हेही आयुक्तांनी जाणून घेतले आहे.
-मावळमध्ये वर्षाविहारासाठी गेलेली वीस वर्षीय तरुणी कुंड मळ्यात वाहून गेलीय
-साक्षी सतीश वंजारे ही तरुणी मैत्रिणीसह इंदोरी येथील कुंडमळा येथे आली होती, कुंड मळाच्या कडेला फिरत असताना साक्षीचा पाय घसरला अन ती कुंडमळ्यात पडली
-पाण्यात वाहून गेल्याने तिचा शोध घेतला जातोय, तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते
-वर्षाविहारासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यायला हवी अस या घटनेतून अधोरेखित होतय
मुंबईला गेल्या दोन दिवसात पावसाने झोडपलं आहे. मात्र गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर हा कमी झाला आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे.
चांदोलीत सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, वारणा नदीवरील कोकरूड रेठरे बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
दुपारी 3 वाजता उपग्रह निरीक्षण: उत्तर कोकणात मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी; पालघर, मुंबई ठाणे रायगड पुढील ३, ४ तास. दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल ... pic.twitter.com/vyJfgDn8Qc
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2022
जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून खोळंबलेल्या पेरणीला उद्यापासून वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबईच्या अंधेरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, रस्त्यांवरून पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. अंधेरी सबवे असो की आजूबाजूचे रस्ते, सर्वत्र यावेळी पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान आहे की बॅरिकेड्स आणि दुचाकीही वाहू लागल्या आहेत. आजूबाजूची सर्व दुकाने जलमय झाली असून रस्त्यावर उभी केलेली वाहनेही आता पाण्यात बुडाली आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागझरी गावातून जाणाऱ्या तळोजा कल्याण रस्त्यावर एमआयडीसीतील कंपन्यांनी नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनांच्या दोन-तीन किलोमीटर दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत. अधिकृत व अनधिकृत कंपन्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच नैसर्गिक नाले बुजविल्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेकडो वाहने थोड्याशा पावसामुळे अडकून पडत आहेत. एमआयडीसी व पनवेल महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करून नैसर्गिक नाले खुले करण्याची मागणी होत आहे. वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नसल्याने ट्रॅफिक जामची नेहमीच समस्या निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे. डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळे बोरीपाडा येथील शाळेच्या इमारतीची भिंत मुसळधार पावसामुळे जमीन दोस्त झाली आहे . सुदैवाने ही दुर्घटना रात्री घडल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा शिक्षकाला इजा झाली नाही . पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याच पावसामुळे ही भिंत कोसळल्याचे समोर आलय . मात्र पळे बोरीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाली असून त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून येथील शिक्षक आणि ग्रामस्थ करत होते, मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने मध्यरात्रीच्या सुमारास अखेर ही दुर्घटना घडली .
जळगावातील पाचोरा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे शेतकरी दुबार प्रेरणीच्या संकटात सापडला होता. यामुळे झालेल्या दमदार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव व उपाय योजना त्वरीत राबवण्यासाठी NDRFचे पथक कराडमध्ये दाखल झाले असून कराड, पाटण तालुक्यातील संभाव्य परस्थितीची माहिती घेतली जात आहे,
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय..... कोल्हापूरच्या प्रयाग चिखली जवळ असलेल्या प्रयाग संगमावर कुंभी कासारी भोगावती तुळशी आणि धामणी या पाच नद्यांचा संगम होतो... या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यान प्रयाग संगमाच्या ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण झालंय... नद्यांनी पात्र सोडल्यानंतर आजूबाजूच्या शेतामध्ये हे पाणी जायला सुरवात झालीय..या पाच नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा नदी वाहते.
पाहा व्हिडिओ
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.. त्यामुळं पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे......
नंदुरबार शहरासह तालुक्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली होती. वरुणराजा बरसत नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट समोर उभा राहिलं होतं. आज तीन वाजेच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई महापालिकेशी समन्वय राखावा. पाणी साचून सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी ( नोडल) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बसेस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी लोकांना माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧 📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे. 🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी... https://t.co/kxlIAKcXa7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
रायगडावरील एक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. एका शिवप्रेमीने हा व्हिडिओ शूट केला आहे.
मंत्री बच्चू कडू यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. अमरावती चांदूर बाजार परिसरात तसेच इतरही काही भागात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप,
राजोली गावात आज सकाळी या मौसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला आणि शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले,
ग्रामपंचायतने नाल्यांची व रस्ताची उंची वाढविल्या मुळे राजोली गावात पावसाचे व नाल्याचे पाणी घरात घुसल्याच्या लोकांचा आरोप,
घरात पाणी शिरल्याले लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सिंधुदुर्गात हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाने चकवा दिला असून आज सकाळ पासून जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा दोडामार्ग तालुक्यात 170 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आज सकाळ पासून जिल्ह्यात संमिश्र वातावरण आहे. कधी ढगाळ, कधी ऊन तर कधी मोठी सर अशा स्वरूपाच वातावरण जिल्ह्यात आहे. पाऊस कमी असला तरी पडझडीच्या घटना घडल्यामुळे काही ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा देखील झाला होता. हवामान खात्याने काल रेड अलर्ट दिला होता मात्र रत्नागिरी आणि रायगडच्या तुलनेत पाऊस झाला नाही तर आज हवामान खात्याने सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असला तरी पावसाने हवामान विभागाच्या अंदाजाला चकवा दिला आहे.
सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले होते. ते सध्या पुन्हा पुर्ववत करण्यात आले आहेत.
या बदलण्यात आलेल्या बेस्ट बसचे मार्ग पूर्ववत करण्यात आले आहेत.#MyBMCUpdates https://t.co/NVIYGXuFGZ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
जिल्ह्यात आठ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा नदी, सावित्री नदी, या नद्यांनी आज धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी रोहा शहरातील कुंडलीका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. नदीकाठी राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
ठाण्यात मुसळधार पावसामुळे वाहतुक कोंडी झाली आहे
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
लातूर जिल्ह्यात खरिपाचे 6 लाख 12 हजार 421 हेक्टर क्षेत्र
2 लाख 30 हजार 379 हेक्टरवर पेरा झाला
पावसाची सरासरी लक्षात घेतली तर केवळ 150 मिमी पावसाची नोंद
ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
राजोली गावात आज सकाळी या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला आणि शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
ग्रामपंचायतीने नाल्यांची आणि रस्ताची उंची वाढवल्यामुळे राजोली गावात पावसाचे आणि नाल्याचे पाणी घरात घुसल्याचा नागरिकांचा आरोप आहे
घरात पाणी शिरल्याले लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
भंडारा : चुलबंद नदीच्या अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले दहा शेतकरी
नावाड्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
सोनी आवळी घाटावरील घटना
सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं आहे.
#WATCH | Heavy waterlogging in Chembur area of Mumbai as rains lash the city pic.twitter.com/e3SLqWRe6O
— ANI (@ANI) July 6, 2022
खडकवासला धरणात तीन महिने पुरेल इतका पाणीसाठी,
सद्या विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोवर वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणात सद्या ७१.९६ टक्के जलसाठा आहे. या धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहे. यातून ३० सेमी ने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीपात्रात कुणीही उतरू नये असे आव्हाहन देखील करण्यात आले आहे.
चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगर भाग कोसळला सदर घटनास्थळी चेंबूर अग्निशमन जवान व चुनाभट्टी पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे सदर व्यक्तीस उपचार करण्यासाठी सायन रूग्णालयात पाठवले आहे
पुण्यात पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी
पुण्यातील अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा
पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर साचले पाणी
मागील एक तासापासून शहराचा मध्यवर्ती भाग जाम
नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे दोन झाडे कोसळून गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे
मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे तरीदेखील पावसाची रिपरिप पाहायला मिळते
वसई पूर्वेतील मीठागरांमध्ये पुराचं पाणी भरलं, मार्ग काढताना नागरिकांची कसरत
कालपासून तिथल्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे
अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईत वाहतुक कोंडी
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
Mumbai | Traffic jams grow due to severe water logging amid heavy rains, visuals from Kala Nagar area pic.twitter.com/xetiyBIvRd
— ANI (@ANI) July 6, 2022
गेल्या ५ तासात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अग्निशमन दलाकडे प्राप्त झालेल्या विविध वर्द्या...
१) आग - १
२) इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट - ०
३) झाड पडणे - १३
४) मनपा इलेक्ट्रिक पोल वाकला - १ (शिवदर्शन, महालक्ष्मी मंदिरजवळ)
५) पाणी शिरले - ०
६) भिंत पडणे - ०
वरिल प्रकारच्या वर्द्यामधे कुठे ही जिवितहानी वा जखमी नाही
झाडपडी ठिकाण
1) दत्तवाडी पोलिस चौकीजवळ 2) शिवणे, शिंदे पुलाजवळ 3) टिंगरेनगर, गल्ली क्रमांक ६ 4) लुल्लानगर 5) भवानी पेठ, मनपा वसाहत क्र 10 6) औंध, आंबेडकर चौक 7) प्रभात रोड, लेन नं 14 8) नवीन सर्किट हाऊसजवळ 9) नाना पेठ, अशोका चौक 10) कळसगाव, जाधव वस्ती 11) हडपसर, क्वालिटी बेकरीजवळ 12) कोथरुड, मयुर कॉलनी 13) एरंडवणा, गुळवणी महाराज रस्ता
अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडलीये. वेल्फेअर सेंटर ते रोटरी क्लब दरम्यानच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड कोसळलं. यामुळे रस्त्याची एक बाजू बंद झाली आहे. हा रस्ता अंबरनाथ एमआयडीसीत जाणारा मुख्य रस्ता असून वडवली परिसरातून स्टेशनला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळं झाड कोसळल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून हे झाड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय.
सूर्या नदी वरील धामणी धरण सध्या दोन दिवस झालेल्या पावसाने 24.14 % भरले असून धरणक्षेत्रात हवा तसा पाऊस झालेला नसला तरी धामणी धरण खालोखाल असलेला कवडास बंधारा यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाच्या खालोखाल असलेला कवडास उन्नती बंधारा 100 टक्के भरला असून सुर्या नदीत 51.43 क्यूमिक पाण्याचा विसर्ग सध्या सुर्या नदीत सुरू आहे. धामणी धरण व कवडास बंधारा मूळ परिसरातील 7 हजार 400 हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा करिता मोठा फायदा होत असतो.
We started working on Gandhi Market and Hind Mata. Yesterday’s heavy rainfall has shown that both places had uninterrupted traffic, probably a first in all these decades, due to the pump & underground rain holding tanks we’ve made. Milan Subway tank would be ready by next year. https://t.co/hl4r4qsjyO
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 6, 2022
ठाण्यातील मुंबई नाशिक हायवे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास ६ ते ७ किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत... मुंबई कडून नाशिक कडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालीय... भिवंडी -कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालीय..
राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे
मुसळधार पावसामुळे साताऱ्यात दरड कोसळली
#WATCH | Satara, Maharashtra | Landslides near Pratapgarh fort in Satara district, no casualties reported pic.twitter.com/sLTAPH6ogw
— ANI (@ANI) July 6, 2022
नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले
VIDEO : Navi Mumbai Water Logging | नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले - tv9#MonsoonUpdate #RainFall #NaviMumbai
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/pyQ9DvTQ3w
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 6, 2022
उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडलं
कॅम्प ४ मधील सुभाष टेकडी, महात्मा फुले कॉलनीतली घटना
या घटनेत सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही
माजलगाव तालुक्यात रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसात गुजरवाडी येथील पूल पूल वाहून गेल्याने दोन गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्याने एक वृद्ध शेतकरी वाहून गेला. बाबुराव नरवडे असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याचा मृतदेह सकाळी आढळून आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पूल दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी होती मात्र प्रशासनाकडून कसलीच डागडुजी करण्यात आली नाही. अखेर पहिल्याच पावसात पूल वाहून गेला. दिवसा या पुलावर मोठी रहदारी असते रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पुणे- महाड मार्गावरील वरंधा घाट सर्वप्रकारच्या वाहतुकी साठी बंद करण्यात आलाय. गेल्या दोन दिवसापासून या भागात मुसळधार पाऊस सुरूय त्यामुळं घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचलाय,त्याच बरोबर घाटात दरड, माती कोसळत असल्यानं हा निर्णय घेण्यातं आलाय.मागच्या आठवड्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा अलर्ट मिळाल्यानंतर जड वाहनांसाठी हा घाट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यातं आला होता, मात्र पावसामुळं घाट रस्ता खचत असल्यानं आणि जागोजागी दरड कोसळत असल्यानं आता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. दरम्यान वरंध घाटातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय जगताप यांनी.
वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरूच
वसई सनसिटी ते गास जाणारा रस्ता गेला पाण्याखाली
चोहीबाजूने मुख्य रस्त्याला पाण्याने घातला वेढा
कंबरे इतक्या पाण्यातून वाहन नेताना बंद पडल्याने वाहनचालकांना ढकलत आणावे लागत आहेत वाहन
वसई सनसिटी ते गास, सोपारा, भुईगाव, विरार ला जोडणारा आहे रस्ता
रस्त्याच्या कडेला उभे असणारे वाहन ही साचलेल्या पाण्यात बुडाली आहेत..
Thane, Maharashtra | Heavy rain lashes city, water level rises at the Talao Pali lake pic.twitter.com/DX3nEBDEZW
— ANI (@ANI) July 6, 2022
वसईतील मिठाग्रहला पूर्ण पाण्यानी वेढा टाकला आहे.
वसई पूर्व ला मुख्य रस्त्याच्या एक किलोमीटर अंतरावर 400 ते 500 रहिवाशांची मिठाग्रह ही लोकवस्ती आहे..
रात्री पासून पडणाऱ्या पावसाने या वस्तीला 4 ही बाजूने वेढले असून, तेथील महिला, पुरुष, वयोवृद्ध ना गुडगा ते कंबरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत बाहेर पडावे लागत आहे..
याच मिठाग्रह चा आढावा घेऊन पाण्यातून मार्ग काढणार्या नागरिकांशी बातचीत
जोरदार पावसाने गांधी मार्केट सखल परिसरात साचणाऱ्या पाण्याचा अत्यंत वेगाने उपसा करून पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. #MyBMCUpdates pic.twitter.com/utrc3J24Lw
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
जोरदार पावसाने हिंदमाता सखल परिसरात साचणाऱ्या पाण्याचा अत्यंत वेगाने उपसा करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.#MyBMCUpdates pic.twitter.com/hz5WbscVSt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
खालील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
बस क्र ५,७,८,११,६६,३८५,३५७,५२१ गांधी मार्केट , महेश्वरी उद्यान येथून सुलोचना शेट्टी मार्ग, भाऊ दाजी रोड मार्गे
सायन रोड क्र.२४ येथून बस क्र. ३४१,४११,२२,२५,३१२ सायन रोड क्र. ३ मार्गे#MyBMCUpdates https://t.co/B6I2IRNYU1
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
कणकवली-नरडवे रस्त्यावर झाड कोसळले.वाहतूक विस्कळीत. एकेरी वाहतूक सुरू. कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी पडलेले झाड तोडून रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेरील रस्त्यावर हे झाड पडले आहे.
विरार पश्चिम स्टेशन ते बोलींज रस्त्या गुडगाभर पाण्याखाली गेला आहे..
बोलींज रस्त्या लागत च्या सोसायटी मध्ये ही शिरले पाणी
रस्त्यावर वाहन बंद पडत असल्याने अनेक नागरिक ट्रेकटर मधून प्रवास करीत आहेत...
पावसाची उघडझाप सुरू असतानाही वसई विरार नालासुआरा मधील पाणी ओसारण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक हैराण
मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पुन्हा एकदा मान्सूनने दणका दिला आहे,
बांद्रा, अंधेरी, बोरीवली सह उपनगरातील अनेक भागात पुन्हा एकदा मूसलाधार पाऊस पडत आहे,
अंधेरी सबवे येथे तुम्ही पाहू शकता किती मुसळधार पाऊस पडत आहे, सबवे मध्ये आणि रस्त्यावर पाणी साचू लागले आहे,
हवामानाचा रंगही बदलला आहे, आणि रस्त्यावरून जाणारे वाहन हळू-हळू चालत आहे, वाहनांचे लाईट लावून भुयारी मार्गावरून गाड्या धावताना दिसत आहे.
आता हा पाऊस असाच पडत राहणार की थांबणार हे पाहावं लागेल.
Maharashtra | As heavy rainfall lashes city with IMD issuing an orange alert, severe waterlogging recorded in several parts of Mumbai. Visuals from Dadar area pic.twitter.com/7JHRvYb1Wy
— ANI (@ANI) July 6, 2022
आज मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Maharashtra | As heavy rainfall lashes city with IMD issuing an orange alert, severe waterlogging recorded in several parts of Mumbai. Visuals from the Sion area pic.twitter.com/52zpLcpJ78
— ANI (@ANI) July 6, 2022
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद. तर चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार आहे.
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु
यामुळे या धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरवात
गेल्या तीन दिवसांत या सर्व धरणांत मिळून पुणे शहराला आणखी किमान तीन महिने पुरेल इतकी पाणीसाठ्यात वाढ
यामुळे पुणेकरांच्या डोक्यावरील पाणी कपातीची टांगती तलवार आता दूर होण्याची शक्यता
मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बेस्टच्या काही बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
The following #BEST routes have been diverted:
At Gandhi Market, Maheshwari Udyan: -5, 7, 8, 11, 66, 385, 357, 521 Via Bhau Daji Road, Sulochana Shetty Marg
At Sion Road No.24 - 341, 411, 22, 25, 312 Via Sion Road no. 3#MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
नवी मुंबई मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसास सुरुवात
जुईनगरच्या सबवेमध्ये साचलं पाणी
गडचिरोली जिल्ह्यात दोन धरणाचे दरवाजे आज उघाडण्यात आले
महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 88 पैकी 30 दरवाजे सोडण्यात आले असून 1964 क्युमेक्स (16350 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग या धरणातून होत आहे
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसाच्या नोंद मध्ये 13.00 मिमी पावसाची नोंद झाली
सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नाही
गडचिरोली येथील चिचडोह बॅरेजचे ही 38 पैकी 38 दरवाजे दीड फुटांनी उघडले असून त्यातून 1244 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे
दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर वाढला
वरळीहून लोअर परेल महालक्ष्मी कडे जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडी
रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची तारांबळ
कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान विभागांना रेड अलर्ट जारी केलाय. पण सध्या पाऊस सरींवरती बर असताना दिसून येतोय. ज्या ठिकाणी पाणी शिरलं होतं किंवा तुंबलं होतं ते आता हळूहळू उतरायला सुरुवात झाली आहे. पण एकंदरीत समुद्र किनारपट्टीच्या काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे. अर्थात तिन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास ज्या काही प्रमुख नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत होत्या त्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झाली आहे. सुदैवानं कोणत्याही मोठ्या दुर्घटना आतापर्यंत घडलेल्या नाहीत. नागरिकांना स्थलांतर करणे त्यांना सूचना देणे सर्व कर्ज काम सुद्धा प्रशासनाकडून केले जात आहे. कोकणातला गेल्यावर्षीचा अनुभव पाहता एन डी आर एफ च्या टीम देखील तैनात करण्यात आले आहेत.
-लोणावळ्यात गेल्या 24 तासात 166 मिमी पावसाची नोंद झालीय
-गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय
-लोणावळा परिसरात ह्यावर्षी आतापर्यंत 581 मिमी पावसाची नोंद झालीय जी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे, गेल्या वर्षी याच वेळेस एकूण 1 हजार 105 मिमी पावसाची नोंद झाली होती
-काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने मावळात जोरदार आगमन केल आहे.
-पाऊस नसल्याने शेतकरी राजा चिंतेत होता. परंतु आता दमदार पावसाने भाताची शेती ला जीवदान मिळणार आहे,आंदर मावळच्या पश्चिम पट्टयात पावसाची जोरदार सुरवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
-जोरदार पावसामूळे शेताच्या खाचरात पाणी साचले असून लवकरच भाताच्या पिकाला बहार येणार आहे..मावळात 13500 हेक्टरवर भात शेती केली जाते..त्यामुळेच मावळला भाताचे आगार म्हंटल जाते..
पावसाचा सगळ्यात अधिक जोर रत्नागिरीत राहिला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत कधी कुठे किती झाला पाऊस
Last 24 hours #MumbaiRains Colaba 84mm, Bycalla 133, Airport 206mm, VidyaVihar 198, Nerul 190. Not much respite today, Heavy rains to continue in Mumbai & surrounding areas as vortex formation along North Konkan.
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) July 6, 2022
६ जुलै २०२२
हवामान अंदाज :-. मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भरती :- सायं ४:४९ वा. - ३.८८मी.
ओहोटी:- रात्री ११.११ वा. - १.६६ मी. https://t.co/IvBmWUxwCn
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
मुंबईत आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली, वांद्रे येथील हा व्हिडीओ आहे...
#WATCH | Heavy rainfall lashes Mumbai this morning, visuals from Bandra. pic.twitter.com/tSo7sIIBhc
— ANI (@ANI) July 6, 2022
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सगळीकडे पाणीचं पाणी आहे
जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफ पथकाची मागणी. सिंधुदुर्गात आज एनडीआरएफ ची तुकडी दाखल होऊ शकते. हवामान विभागाने जिल्ह्यात आणखी 3 दिवस मुसळधार पावसाचा ईशारा दिला असल्यामुळें खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाची मागणी केली आहे.
नवी मुंबईतील शिरवणे भुयारी मार्गत साचलं पाणी
त्यामुळे नागरिकांना जुईनगर व शिरवणे गाव येथे जायचे असेल तर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो आहे
भुयारी मार्गात पाणीच साचल्याने दुचाकी वाहन बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे
मुंबईत काही तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे
अनेक ठिकाणी ढगाळवातावरण आहे
कालपासून कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पाणी पात्रात अधिक वाढ झाली आहे. काल रात्री उशिरा एनडीआरएफची एक टीम कोल्हापूरात दाखल झाली आहे.
रत्नागिरीच्या परशुराम घाटात मुसळधार पाऊस
घाट आठ दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.
c
-लोणावळ्यात गेल्या 24 तासात 166 मिमी पावसाची नोंद झालीय
-गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय
-लोणावळा परिसरात ह्यावर्षी आतापर्यंत 581 मिमी पावसाची नोंद झालीय जी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे, गेल्या वर्षी याच वेळेस एकूण 1 हजार 105 मिमी पावसाची नोंद झाली होती
रत्नगिरी,- जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाची विश्रांती
काजळी नदीचं दुथडी भरून
नऊ तारखेपर्यंत जिल्ह्याला रेडअलर्ट
राजापूर मधील अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली
सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे प्रशासनासाठी चिंतेची बाब नाही
गेल्या दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत असताना रत्नागिरीतील काजळी नदीच्या पुराचा फटका मठ येथील देवस्थानाला बसला असून हे देवस्थान गेले तीन दिवस पाण्यात आहे. लांजा मठ येथील मंदिर हे स्वयंभु दत्तमंदिर असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे सध्यस्तिथीत अर्धा मंदीराचा भाग हा पाण्यात बुडालेला आहे. पाऊस जर असाच पडत राहिला तर मंदिराच्या कळसापर्यंत हे पाणी पोहचेल असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या दत्तमंदीरात अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात परंतु गेल्या तीन दिवसापासून हे मंदीर पाण्यात असल्यामुळे भाविकांना येथे येण्यास बंदी केली असल्याचे समजते.आता हे पुराचे पाणी कधी ओसारतेय याकडे भाविकांचे व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
अमरावती ४ जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी नदी नाले ओसंडून वाहू लागले.यात पेढी नदीला पूर आल्याने पेढी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भातकुली तालुक्यातील सावरखेड गावचा संपर्क तुटला आहे.पुलावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे येण्याजण्याचा मार्ग बंद झाला असल्याने सावरखेड ची वाहतूक थांबली आहे.
पालघरमध्ये रात्री 12 वाजता NDRF ची टीम दाखल,
जिल्हा प्रशाशनाकडून मागवण्यात आली NDRF ची टीम
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशाशन अलर्ट
रात्रभर पडलेल्या पावसाने नालासोपारा जलमय नालासोपाऱ्यात सेन्ट्रलपार्क, स्टेशन रोड, ओसवाल नगरी, तुलिंज रोड
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यत्न पडलेल्या पावसाचा अहवाल आला असून गोंदिया जिल्हातिल तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी आणि गोंदिया चार अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 150.7 मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झाली आहे. तिरोडा तालुक्यात 140 मिमी आणि गोरेगाव तालुक्यात 106 व गोंदिया तालुक्यात 81 .4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचे संकेत मिळाल्याने गोंदिया जिल्हा प्रशासन अलर्ट मोड़ वर आहे....
खेड सह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेला चासकमान धरणात अवघ्या 6.65% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमाशंकर अभयारण्य परिसरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने भीमा नदी प्रवाहित झाली आहे या धरणामुळे खेड तालुक्यासह शिरूर तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 83 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे परिसरामध्ये हलक्या सरी पडत असल्याने भीमा नदी प्रवाहित झाली असून मोठा पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे
पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली तीस फुटांवर
काल दिवसभरात पाणी पातळीत सहा फुटांची वाट
जिल्ह्यातील 25 बंधारे पाण्याखाली
पावसाने उसंत घेतल्याने काहीसा दिलासा
एनडीआरएफच्या दोन टीम रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील घाटघर नाणेघाट येथे ब्रिटिशकालीन पद्धतीने बांधण्यात आलेला फडके बंधारा यंदा पहिल्याच पावसात तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे.स्थानिक खासदार आमदार यांच्या प्रयत्नातून जलसंधारण योजनेतून या बंधाऱ्याची नुकतीच पुनर्बांधणी करण्यात आली होती आणि यानंतर पहिल्याच पावसात हा बंधारा ओसंडून वाहू लागला आहे,या बंधाऱ्याचां आदिसी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
- पावसामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठा वाढण्यास सुरुवात
- चार दिवसांतल्या पावसाने राज्यातील धरणांमध्ये सरासरी २ टक्के पाणीसाठा वाढला
- राज्यातील धरणांमध्ये सध्या २३ टक्के पाणीसाठा
- ४ दिवसातल्या पावसाने कोकण विभागातील धरणातील पाणीसाठा ४ टक्के वाढला
- जून महिन्यात पावसानं दांडी मारल्याने अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला होता
- आता मुसळाधार पावसाने राज्यातील राज्यातील अनेक भागात धरणातील पाणीसाठा वाढायला सुरुवात
रत्नागिरी- सुरक्षेच्या दृष्ट्रीने पर्शुराम घाट बंद करण्यात आला आहे. काल पर्शुराम घाटातील वाहतुक झाली होती सुरु, घाटातील नवीन रस्त्याला तडे गेले आहेत. सततच्या पावसाने चौपदरीकरणाच्या रुंदीकणाच्या कामाला फटका. सुरक्षेसाठी वाहतुक आज देखिल सकाळपासून बंदअवजड वाहतुकीला घाटात बंदी त्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा
हवामान खात्याने दिला पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
जिल्ह्यात 6 ते 9 जुलै या आगामी चार दिवस 50 मिमीपेक्षा जास्त म्हणजेच मुसळधारचा इशारा
गेल्या चोवीस तासांत घाटमाथ्यासह पुणे शहर, पिंपरी -चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस झाला
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा मंगळवारी दिला
जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या चोवीस तासांत सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस
आगामी चार दिवसांत 60 ते 99 मिमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा दिला
पुणे धरण पाऊस अपडेट धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर पाऊस सुरू खडकवासला 18 मिमी, पानशेत -68 मिमी, वरसगाव 70 मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात 65 मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 3.67 टीएमसी झाला आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊसाची नोंद कोयना धरणात 17.46 tmc पाणीसाठा झाला
सकाळी 6 वाजेपर्यंत कोयनानगर 137 मिलिमीटर नवजा 197 मिलीमिटर महाबलेश्वर 155 मिलीमीटर वळवण 182 मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर नदीत फेस
मुसळधार पावसानंतर हा प्रकार घडला आहे
नेमका कशामुळा हा प्रकार घडला आहे...हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत. वाशिष्ठी नदीत पाणी पात्रात वाढ झाली आहे.
नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास वरूनराजाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय, धुळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळालाय. तर पावसाच्या प्रतीक्षेत थांबलेल्या शेतकरी आता पेरणीला सुरुवात करणार आहेत. सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आता खऱ्या अर्थाने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे सांगण्यात येतय.
पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यानं धरणाच्या पाणी पातळीने तळ घाटला होता. मात्र मागच्या दोन दिवसापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागलीय. त्याचं बरोबर शेतात पेरणी केलेल्या भात आणि कडधान्य पिकांना पाऊस फायदेशीर ठरत असल्यानं शेतकरी आणि नागरिकांच्यात समाधानाचं वातावरणयं.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव काल संध्याकाळी ओसंडून वाहू लागला.
#WATCH | Maharashtra: Due to heavy rainfall in Mumbai, Powai Lake started overflowing at 6.15 pm today.
(Source: BMC PRO) pic.twitter.com/JSpetDsKpy
— ANI (@ANI) July 5, 2022
मुंबईतील दहिसर परिसरात तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्यासाठी शोधमोहीम सुरू आहे:
#WATCH | Maharashtra | Two people drowned after they went to take a bath in a pond in Mumbai's Dahisar area. One of the bodies has been found and a search operation underway for the other: Mumbai Fire Brigade (MFB) pic.twitter.com/WIOs1tRZNk
— ANI (@ANI) July 5, 2022
अकोल्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. साधारण रात्री तीनच्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये आनंद देखील पाहायला मिळत आहे.
घोडबंदर रोड काजुपाडा परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या चाकाखाली तो तरुण आला. या अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला. या अपघाताची माहिती काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिलीय.
कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मात्र, पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्यानं जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, पुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. यातील एक टीम कोल्हापूर तर दुसरी शिरोळ तालुक्यासाठी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. प्रत्येक टीममध्ये 25 जवानांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या जवानांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली.
कोल्हापुरात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल
कोल्हापूर जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला आहे. गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदी धोक्याची पातळीवर आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे चंदगड तालुक्यातील वीज गायब झाली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्य मंत्र्यालयाकडून स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक पाणी साचल्याने तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागली. यामुळे नागरीकांची मोठी तारांबळ उडाली.
हिंगोली-जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात
पंधरा दिवसांच्या विश्रांती नंतर जोरदार पावसाला सुरुवात
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
गडचिरोली- महाराष्ट्रात तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 88 पैकी 16 दरवाजे सोडण्यात आले आहेत. या मधून 1244 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या इंद्रावती प्राणहिता गोदावरी या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. चिवडा बॅरेज येथील 38 पैकी 38 दरवाजे दीड फूट आणि उघडलेले आहेत 587 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
मुंबईसह उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत.
Published On - Jul 04,2022 7:35 PM